कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूर्तामधील अर्धा मुहूर्त!
मध्य आणि उत्तर भारतात मात्र याच दिवशी नवीन विक्रम संवत् सुरू होतो. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात
गोवर्धन पूजा
हिंदू धर्माच्या शालिवाहन शक कालगणनेनुसार ८ व्या महिन्यातील म्हणजे अश्विन महिन्यातील आज पहिला दिवस. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.
उटणे असलेले ओवळणीचे ताट
दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
फुजी आणि स्कॉट यांनाही विक्रम संवत्सराचा नववर्षदिन साजरा करायचा होताच. अर्थात दिवाळी फराळासाठी घरी लवकर परतही यायचे असल्याने आज फार लांब काही जाता येणार नव्हते. अखेरीस दोघांनी नेहमीप्रमाणे काटई पाइपलाइन रस्त्याला जायचे ठरवले. घरातून निघेपर्यंत बरेचसे उजाडले होते. नेहमीप्रमाणे संथगतीने सुरुवात करत दोघेही ठाकुर्ली पुलामार्गे डोंबिवली पूर्वेला जाऊन मंजुनाथ शाळेपाशी पोचले. तिथून पुढे मात्र थोडासा वेग घेण्याची संधी मिळाली. झपाट्याने कल्याण शीळ रस्ता गाठल्यावर चांगलीच लय सापडली होती. त्याच लयीत फुजी आणि स्कॉट बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागले.
समोरच्या दिशेने रस्त्याच्या डावीकडे मलंगगड डौलात उभा होता. त्याचा राजेशाही रुबाब पाहताना श्विन आणि फुजी नेहमीच हरखून जात असत. पहाटेच्या वेळेस मलंगगडाच्या डोक्यावर प्रगटणारा तेजोगोल त्याचे सौंदर्य नेहमीच वाढवत असे. तो तेजोगील तेव्हा एखाद्या देवतेच्या मुगुटावर विराजमान झाल्याप्रमाणे भासत असे. तीच शोभा पाहत फुजी आणि स्कॉट निर्वेधपणे जात होते. पाहता पाहता दोघांनी अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळील वैभव हॉटेल गाठले. तेथूनच आज परत फिरायचे होते. तोच समोरून पताका आणि रंगात न्हाऊन निघालेला बळीराजाचा सखा येताना दिसला.
त्याचे दर्शन घेत फुजी आणि स्कॉट पुन्हा घराकडे परतू लागले. परतीच्या वाटेवर असताना स्कॉटला काय ओवाळणी द्यायची याबद्दल फुजीच्या मनात विचारचक्र सुरू होते. काहीतरी मानवनिर्मित देण्यापेक्षा काहीतरी 'ओरिजिनल' द्यावे असा विचार मनात घर करत होता. त्याच विचारात फुजीची वाटचाल सुरू होती. पाठोपाठ स्कॉटही होतीच. मात्र त्या वेगात जात असताना फुजीच्या नजरेला रस्त्यामध्ये काहीतरी पडलेले दिसले. ती प्रतिमा अगदीच छोटी होती, त्यामुळे नक्की काय होते ते मात्र फुजीला कळले नाही. फुजीने मागे वळून पाहिले, तर स्कॉट बऱ्याच मागे होती. अखेर फुजीने पायउतार होत परत मागे मोर्चा वळवला. काही पावले मागे जाताच फुजीच्या दृष्टीस रस्त्यावर पडलेली आकृती स्पष्ट झाली. ते एक अतिशय लहान आकाराचे पाखरू होते. सकाळच्या वेळेस भरारी घ्यायला बाहेर पडलेल्या त्या पाखराचा प्रवास मात्र अकल्पितपणे संपुष्टात आला होता. महामार्गावरील भरधाव वेगात जाणाऱ्या प्रदूषणकारी वाहनाची टक्कर त्या पाखराला जीवघेणी ठरली होती.
त्या पाखराकडे पाहत असतानाच फुजीला श्विनने केलेली saveoursahyadri मोहीम आठवली. आनंद पेंढारकर यांची कळकळ पुन्हा एकदा तीव्रपणे आठवली. त्याचवेळी आपण ह्या पाखराबाबत काहीही करू शकत नाही याबद्दलही फुजीला दुःख होत होते.
एवढ्यातच मागून येत असलेली स्कॉट फुजीला दिसली. स्कॉटला या कशाचीच कल्पना नव्हती. ते पाखरू इतके छोटे होते की ते सहजपणे दिसू शकत नव्हते. त्यामुळे स्कॉटलाही ते दिसले नाहीच. स्कॉट संयतपणे पण सातत्य राखत मार्गक्रमण करत होती.
स्कॉट पुढे निघून गेली आणि फुजीनेही पुन्हा दौड सुरू केली. काही वेळातच शीळ कल्याण रस्ता गाठत दोघेही डोंबिवलीच्या दिशेने परतु लागले. चहाची तल्लफ आली नसली तरी सवयीप्रमाणे घारडा सर्कलपाशी चहापानासाठी थांबा घेतला. चहासाठीचे फर्मान देत फुजी आणि स्कॉट थोडे निवांत होत होते. इतक्यात स्कॉटला पाडव्यानिमित्त काय ओवाळणी द्यायची हे फुजीला पडलेले कोडे अगदी अलगदपणे उलगडले. स्कॉटच्या हातात चहा आला असला तरी फुजीचे लक्ष मात्र चहाकडे नव्हते. फुजीने मोर्चा वळवला तो त्या निसर्गनिर्मित हळुवार भेटीकडे जी आज पाडव्यानिमित्त स्कॉटला देता येणार होती. स्कॉट चहासाठी फुजी बोलावत असतानाही फुजीने आपला मोर्चा त्या अलौकिक गोष्टीकडे वळवला. फुजीच्या मनात नेहमीच खास स्थान असलेली ती गोष्ट खासच होती. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याच्या पत्नीसाठी स्वर्गातून आणलेली ती गोष्ट कोणत्याही इतर भेटीपेक्षा नक्कीच मौल्यवान होती. श्रीकृष्णाने स्वर्गातून ती भेट आणल्यावर सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातही वाद झाला होता. सुदैवाने श्रीकृष्णाने ते कोडे सहजपणे सोडवले. फुजीला तर तशी काहीही अडचण नव्हतीच.
फुजीने ताबडतोब ती अलौकिक गोष्ट प्राप्त केली आणि स्कॉटला दिली. सत्यभामा आणि रुक्मिणी यांनाही ज्या गोष्टीचे आकर्षण होते ती मिळताच स्कॉटचा आनंदही गगनात मावेना. स्कॉटच्या ओंजळीत ती भेट सुपूर्द करून फुजीलाही इतकी अप्रतिम भेट योग्य वेळी देता आली त्याचा आनंद होत होता.
मध्य आणि उत्तर भारतात मात्र याच दिवशी नवीन विक्रम संवत् सुरू होतो. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
गोवर्धन पूजा
हिंदू धर्माच्या शालिवाहन शक कालगणनेनुसार ८ व्या महिन्यातील म्हणजे अश्विन महिन्यातील आज पहिला दिवस. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.
उटणे असलेले ओवळणीचे ताट
दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
फुजी आणि स्कॉट यांनाही विक्रम संवत्सराचा नववर्षदिन साजरा करायचा होताच. अर्थात दिवाळी फराळासाठी घरी लवकर परतही यायचे असल्याने आज फार लांब काही जाता येणार नव्हते. अखेरीस दोघांनी नेहमीप्रमाणे काटई पाइपलाइन रस्त्याला जायचे ठरवले. घरातून निघेपर्यंत बरेचसे उजाडले होते. नेहमीप्रमाणे संथगतीने सुरुवात करत दोघेही ठाकुर्ली पुलामार्गे डोंबिवली पूर्वेला जाऊन मंजुनाथ शाळेपाशी पोचले. तिथून पुढे मात्र थोडासा वेग घेण्याची संधी मिळाली. झपाट्याने कल्याण शीळ रस्ता गाठल्यावर चांगलीच लय सापडली होती. त्याच लयीत फुजी आणि स्कॉट बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागले.
समोरच्या दिशेने रस्त्याच्या डावीकडे मलंगगड डौलात उभा होता. त्याचा राजेशाही रुबाब पाहताना श्विन आणि फुजी नेहमीच हरखून जात असत. पहाटेच्या वेळेस मलंगगडाच्या डोक्यावर प्रगटणारा तेजोगोल त्याचे सौंदर्य नेहमीच वाढवत असे. तो तेजोगील तेव्हा एखाद्या देवतेच्या मुगुटावर विराजमान झाल्याप्रमाणे भासत असे. तीच शोभा पाहत फुजी आणि स्कॉट निर्वेधपणे जात होते. पाहता पाहता दोघांनी अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळील वैभव हॉटेल गाठले. तेथूनच आज परत फिरायचे होते. तोच समोरून पताका आणि रंगात न्हाऊन निघालेला बळीराजाचा सखा येताना दिसला.
त्याचे दर्शन घेत फुजी आणि स्कॉट पुन्हा घराकडे परतू लागले. परतीच्या वाटेवर असताना स्कॉटला काय ओवाळणी द्यायची याबद्दल फुजीच्या मनात विचारचक्र सुरू होते. काहीतरी मानवनिर्मित देण्यापेक्षा काहीतरी 'ओरिजिनल' द्यावे असा विचार मनात घर करत होता. त्याच विचारात फुजीची वाटचाल सुरू होती. पाठोपाठ स्कॉटही होतीच. मात्र त्या वेगात जात असताना फुजीच्या नजरेला रस्त्यामध्ये काहीतरी पडलेले दिसले. ती प्रतिमा अगदीच छोटी होती, त्यामुळे नक्की काय होते ते मात्र फुजीला कळले नाही. फुजीने मागे वळून पाहिले, तर स्कॉट बऱ्याच मागे होती. अखेर फुजीने पायउतार होत परत मागे मोर्चा वळवला. काही पावले मागे जाताच फुजीच्या दृष्टीस रस्त्यावर पडलेली आकृती स्पष्ट झाली. ते एक अतिशय लहान आकाराचे पाखरू होते. सकाळच्या वेळेस भरारी घ्यायला बाहेर पडलेल्या त्या पाखराचा प्रवास मात्र अकल्पितपणे संपुष्टात आला होता. महामार्गावरील भरधाव वेगात जाणाऱ्या प्रदूषणकारी वाहनाची टक्कर त्या पाखराला जीवघेणी ठरली होती.
एवढ्यातच मागून येत असलेली स्कॉट फुजीला दिसली. स्कॉटला या कशाचीच कल्पना नव्हती. ते पाखरू इतके छोटे होते की ते सहजपणे दिसू शकत नव्हते. त्यामुळे स्कॉटलाही ते दिसले नाहीच. स्कॉट संयतपणे पण सातत्य राखत मार्गक्रमण करत होती.
स्कॉट पुढे निघून गेली आणि फुजीनेही पुन्हा दौड सुरू केली. काही वेळातच शीळ कल्याण रस्ता गाठत दोघेही डोंबिवलीच्या दिशेने परतु लागले. चहाची तल्लफ आली नसली तरी सवयीप्रमाणे घारडा सर्कलपाशी चहापानासाठी थांबा घेतला. चहासाठीचे फर्मान देत फुजी आणि स्कॉट थोडे निवांत होत होते. इतक्यात स्कॉटला पाडव्यानिमित्त काय ओवाळणी द्यायची हे फुजीला पडलेले कोडे अगदी अलगदपणे उलगडले. स्कॉटच्या हातात चहा आला असला तरी फुजीचे लक्ष मात्र चहाकडे नव्हते. फुजीने मोर्चा वळवला तो त्या निसर्गनिर्मित हळुवार भेटीकडे जी आज पाडव्यानिमित्त स्कॉटला देता येणार होती. स्कॉट चहासाठी फुजी बोलावत असतानाही फुजीने आपला मोर्चा त्या अलौकिक गोष्टीकडे वळवला. फुजीच्या मनात नेहमीच खास स्थान असलेली ती गोष्ट खासच होती. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याच्या पत्नीसाठी स्वर्गातून आणलेली ती गोष्ट कोणत्याही इतर भेटीपेक्षा नक्कीच मौल्यवान होती. श्रीकृष्णाने स्वर्गातून ती भेट आणल्यावर सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातही वाद झाला होता. सुदैवाने श्रीकृष्णाने ते कोडे सहजपणे सोडवले. फुजीला तर तशी काहीही अडचण नव्हतीच.
फुजीने ताबडतोब ती अलौकिक गोष्ट प्राप्त केली आणि स्कॉटला दिली. सत्यभामा आणि रुक्मिणी यांनाही ज्या गोष्टीचे आकर्षण होते ती मिळताच स्कॉटचा आनंदही गगनात मावेना. स्कॉटच्या ओंजळीत ती भेट सुपूर्द करून फुजीलाही इतकी अप्रतिम भेट योग्य वेळी देता आली त्याचा आनंद होत होता.














