भारतीय निधर्मी राष्ट्रीय दिनांक ५ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंबर २०१९
(Deca - 10, But December is 12 th month... Is it rational, is it scientific, is it logical?
साबरमती आश्रमाबद्दल श्विन(फुजीला) विलक्षण कुतूहल होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील कित्येक लढयांच्या योजना इथेच आखल्या गेल्या असाव्यात. आणि का नाही होणार, कारण कारागृह किंवा प्रवासातील वेळ वगळला तर महात्मा गांधींचे वास्तव्य साबरमती आश्रम किंवा वर्धा येथील आश्रमातच जास्त काळ होत असावे. जवळपास एक तपाचा काळ तरी महात्म्याने ह्या दोन आश्रमातच घालवला होता. मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडीयात्रेचा मूळ पाया साबरमती आश्रमच तर होता.
पाच मजली भक्कम बांधकाम, अप्रतिम कलाकुसर केलेली ती भव्य वास्तू होती अदालज बावडी!
अदालज येथील ह्या पाचमजली खोल विहिरीची भव्यता केवळ फोटोमध्ये सामावणे शक्य नव्हते. ह्या वस्तूची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालपेक्षा तसूभरही कमी नव्हते. ताजमहाल जर भारताचे जमिनीवरील वैभव असेल तर अदालज येथील ही वास्तू भारताचा भूमिगत खजिना आहे.
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंबर २०१९
(Deca - 10, But December is 12 th month... Is it rational, is it scientific, is it logical?
साबरमती आश्रमाबद्दल श्विन(फुजीला) विलक्षण कुतूहल होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील कित्येक लढयांच्या योजना इथेच आखल्या गेल्या असाव्यात. आणि का नाही होणार, कारण कारागृह किंवा प्रवासातील वेळ वगळला तर महात्मा गांधींचे वास्तव्य साबरमती आश्रम किंवा वर्धा येथील आश्रमातच जास्त काळ होत असावे. जवळपास एक तपाचा काळ तरी महात्म्याने ह्या दोन आश्रमातच घालवला होता. मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडीयात्रेचा मूळ पाया साबरमती आश्रमच तर होता.
साबरमती आश्रमाच्या एका बाजूला कारागृह तर दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी होती. गांधीजी म्हणत आश्रमाची ही जागाच योग्य होती कारण सत्याग्रहींना ह्याच दोन पैकी एका ठिकाणी जावे लागत असे.
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळालेल्या साबरमती आश्रमात आम्हा सात सायकलपटूंचे स्वागत होणे तेही हारतुरे घालून हेच अभिमानाचे होते. आणि येथेच अहमदाबाद येथील नवे साथीदार आमच्या सायकलयात्रेत सामील होणे हे तर अधिकच समाधानाचे होते. मात्र काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. अहमदाबाद येथे पाच ऐवजी चार सायकलस्वार तर आम्हाला सामील झाले होते.
खरेतर तिथे इतका जल्लोष सुरू होता की आम्हाला काही विचार करायलाही वेळ नव्हता. आमचे स्वागत झाल्यावर आश्रमाच्या आवारात छोटी फेरी मारण्यासाठी आम्हाला नेण्यात आले. एका बाजूला साबरमती नदी परिसराच्या सौंदर्यात भर घालत होती. तेथील बागही मनमोहक होती.
घड्याळबाबांची टिकटिक चालू होतीच. त्यामुळे आश्रमामध्ये जास्त वेळ घालवणे शक्य नव्हते. नव्याने सामील झालेल्या चार सायकलपटूंबरोबर आमची फेरी पुढे सुरू झाली. मात्र आमच्या बरोबर शुभेच्छा देणाऱ्यांचीही मोठी फौज आमच्याबरोबर येत होती. आमचा उत्साहही चांगलाच वाढला होता. अहमदाबादच्या प्रशस्थ रस्त्यातून जात असताना आमचा जत्था एका चौकात थांबला. लगेचच जमावाने आम्हाला घेरले. त्यांना आमच्याबद्दल उत्सुकता वाटत होती. सगळेजण कुतूहलाने प्रश्न विचारू लागले. त्यात कौतुक होतेच. त्यातच नेहमीचा एक प्रश्न आला,'तुम्ही कशासाठी रॅली काढत आहात?' त्यांना आमच्या रॅलीचा उद्देश 'फिट इंडिया.. सशक्त भारत' हा संदेश देणे आहे हे सांगताच पुढील प्रश्न आला, 'तुम्ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी का रॅली काढत नाही?'
खरतर बुलेट ट्रेनमुळे शीळ फाटा -डोंबिवली -कल्याण -भिवंडी येथील जवळपास २० किमीच्या महामार्गाचे मंजूर झालेले काम रद्द झाले होते. ह्यामुळे स्थानिक वाहतुकीचा बोजवारा वाजला होता. त्यामुळे बुलेट ट्रेन हा श्विन(फुजी)च्या तिरस्काराचाच विषय झाला होता. मात्र सायकलसफारी करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून उत्तर देणे भाग होते.
श्विन(फुजी)ने उत्तर दिले, ' आम्ही आमच्या ध्येयासाठी सायकलफेरी काढली आहे. तुमच्या ध्येयासाठी तुम्ही अहमदाबाद पासून मुंबईपर्यंत जरूर सायकलफेरी काढा. आम्ही तुमचे स्वागत करू.' हे उत्तर ऐकताच प्रश्न विचारणारा मात्र चांगलाच ओशाळला.
आमची सफर पुढे सुरू झाली. या शहरात आम्हाला मिळणारा आनंद केवळ साबरमती आश्रमातील उत्साहपूर्व स्वागतापर्यंतच मर्यादित नव्हता. खरंतर आनंदमिश्रित आश्चर्य आणि भव्यता ह्यांचा एक ठेवा आमच्यासाठी अजून या परिसराने राखून ठेवला होता.
आश्रमापासून साधारण १२- १४ किमी अंतरावर आम्हाला थांबवण्यात आले. सगळ्यांच्या सायकली एका रांगेत उभ्या करायला सांगून आम्हाला एका प्रवेशद्वारातून आत सोडण्यात आले. आमच्याबरोबर जवळपास ४०-५० जण आम्हाला साथ देत साबरमती आश्रमापासून येथे आले होते. आमच्या सायकल हा आमचा प्राणच होता. त्यामुळे प्रवेशद्वारातून आत शिरताना मनावर दडपण येत होते, मात्र आमच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी आम्हाला दिलासा दिला होता. त्यामुळे आम्ही बेफिकिरपणे आत शिरलो. समोर प्रचंड मोठे या आवार दिसत होते आणि काही अंतरावर काही दगडी बांधकाम दिसत होते. आम्ही त्या बांधकामाजवळ गेलो मात्र... आणि खरोखरच स्तिमित झालो. तिथे खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. जसजसे आम्ही पायऱ्या उतरत होतो, आमचे आश्चर्य आणि आनंद वाढतच होते.
अदालज येथील ह्या पाचमजली खोल विहिरीची भव्यता केवळ फोटोमध्ये सामावणे शक्य नव्हते. ह्या वस्तूची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालपेक्षा तसूभरही कमी नव्हते. ताजमहाल जर भारताचे जमिनीवरील वैभव असेल तर अदालज येथील ही वास्तू भारताचा भूमिगत खजिना आहे.





























