भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेसंबंधी सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे ही दिनदर्शिका म्हणजे हिंदू दिनदर्शिका आहे समजणे.
ह्या गैरसमजामूळे ही दिनदर्शिका जाणून घेण्याचा प्रयत्न न करताच काहीजण ह्याचा अभिमान बाळगतात तर उरलेले कालबाह्य म्हणून टीका करतात.
वास्तविक हिंदू कालगणनेतील महिन्यांची नावे आणि शालिवाहन शकातील वर्षाचा क्रमांक राष्ट्रीय कालगणनेमध्ये स्विकारला आहे याव्यतिरिक्त दोहोंमध्ये काहीही साम्य नाही.
काय आहे भारतीय राष्ट्रीय कालगणना आणि हिंदू कालगणना यातील फरक?
१) कालगणनेची सुरुवात:
हिंदू कालगणना प्राचीन आहे.
हिंदू कालगणनेनुसार हे ५१२२ वे वर्ष सुरू आहे. त्याखेरीज अनेक हिंदू राजांनी त्यांच्या राजवटीत नवीन हिंदू कालगणना सुरू केल्या आहेत.
शालिवाहन शकचे हे १९४२ वे वर्ष तर विक्रम संवत्सरचे हे २०७६ वर्ष आहे.
अगदी अलीकडे सुरु झालेली हिंदू कालगणना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरु केलेली हिंदू कालगणना.
भारतीय राष्ट्रीय कालगणना ही अद्ययावत (Latest/ Modern) असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरु करण्यात आली.
संपूर्ण भारतात एक सामायिक कालगणना असावी जी उपयोगात आणण्यास सोपी आणि दोषमुक्त असेल ह्या विचाराने डॉ मेघनाद साहा ह्या खगोलभौतिकी शास्त्रज्ञ असलेल्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली कँलेडर रिफॉर्म कमिटी स्थापन करण्यात आली. त्या समितीने विविध कँलेडरचा अभ्यास करुन खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रोक्त (Scientific) कँलेडर बनवले. तीच आपली राष्ट्रीय कालगणना.
२) आधार:
आपल्याला ज्ञात शालिवाहन शक असो वा विक्रम संवत्सर ..ही हिंदू कालगणना प्रामुख्याने चंद्राच्या स्थितीवर (तिथींवर) अवलंबून आहे.
मात्र भारतीय राष्ट्रीय कालगणना सुर्याच्या स्थितीवर (तारखेनुसार) अवलंबून आहे.
३) दिवस (दिनविशेष):
हिंदू कालगणना चंद्राच्या स्थितीवर म्हणजे कलेप्रमाणे असल्याने दिनविशेष अथवा दिवस तिथीने दर्शविला जातो. प्रत्यक्ष तिथी दिवसभरात केव्हाही संपली तरी सुर्योदयाला जी तिथी असेल ती त्या दिवसभर धरली जाते. नवीन दिवस सुर्योदयाला सुरु होतो. एखादी तिथी सूर्योदयानंतर सुरु होऊन पुढिल दिवशीच्या सुर्योदयापुर्वी संपली तर ती तिथी दोन्हिपैकी कोणत्याही दिवशी धरली न जाता तिचा क्षय झाला असे समजतात. तर एखादी तिथी पहिल्या दिवशी सुर्योदयापुर्वी सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर संपली तर दोन्ही दिवशीचा दिनविशेष तीच तिथी असल्याचे मानले जाते.
भारतीय राष्ट्रीय कँलेडर सौर (सुर्यावर) अवलंबून असल्याने दिनविशेष तारखेने दर्शविला जातो. मात्र दिवस सुर्योदयाप्रमाणे सुरु न होता रात्री १२ ह्या काल्पनिक वेळेला सुरु होतो.
४) महिनाः
हिंदू कँलेडर (कालगणना) मधील महिन्याचे दोन भाग आहेत. आमावस्येनंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल (शुध्द) पक्ष, तर पौर्णिमेनंतर च्या प्रतिपदेपासून आमावस्येपर्यंत वद्य (क्रूष्ण) पक्ष. दोन्ही पक्ष मिळून एकंदर ३० तिथी होतात. ह्या ३० तिथींचा एक महिना धरला जातो.
भारतीय राष्ट्रीय कँलेडर मध्ये तिथींचा संबंध नसुन ३० किंवा ३१ दिवसांचा एक महिना असतो.
५) वर्ष:
हिंदू कँलेडरमध्ये १२ महिन्यातील ३६० तिथी मिळून एक वर्ष पुर्ण होते. ज्याचा कालावधी साधारण ३५४ दिवसांचा असतो.
भारतीय राष्ट्रीय कँलेडरमध्ये ३१ दिवसांचे ५ सलग महिने आणि ३० दिवसांचे ७ महीने असे एकंदर ३६५ दिवसांचे एक वर्ष असते.
६) वर्षारंभ:
हिंदु कालगणनेनुसार ज्या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असते त्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस वर्षारंभाचा दिवस समजला जातो... ज्याला गुढीपाडवा असे म्हणतात.
भारतीय राष्ट्रीय कँलेडरचा वर्षारंभ हा त्या दिवशी असतो सामान्यतः ज्या दिवशी सुर्य विषुववृत्त ओलांडून ऊत्तर गोलार्धात प्रवेश करत असतो...अर्थातच ह्या दिवशी दिवस रात्र समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. ह्या दिवसानंतर सहा महिने ऊत्तर गोलार्धातील दिवस रात्री पेक्षा मोठा असतो.
७) मेळ:
हिंदू कालगणना हि चंद्राच्या स्थितीवर (कलेनुसार) अवलंबून असली तरी ह्या मध्ये सुर्याच्या स्थितीचाही विचार केला आहे. सुर्य आणि चंद्र यांच्या अवकाशातील नक्षत्र व रास ह्यांंच्या स्थितीचा खगोलशास्त्रावर आधारीत विचार करून हिंदू कँलेडर मध्ये शास्त्रोक्त पध्दतीने अधिक महीना धरला जाऊन चांंद्रवर्ष आणि सौरवर्षाचा मेळ घातला जातो.
भारतीय कँलेडर मध्ये चंद्राच्या स्थितीला महत्व दिले जात नाही. मात्र दर ४ वर्षांनी सुर्याच्या स्थितीमध् पडणाऱ्या अंतराचा मेळ घालण्यासाठी एक अधिक दिवस मिळवला जातो. त्यामुळे हे वर्ष ३६६ दिवसांचे असते ज्यामध्ये पहिले सलग ६ महिने ३१ दिवसांचे तर शेवटचे सलग ६ महिने ३० दिवसांचे असतात. ह्या वर्षाला लिपवर्षं असे म्हटले जाते.
ह्या गैरसमजामूळे ही दिनदर्शिका जाणून घेण्याचा प्रयत्न न करताच काहीजण ह्याचा अभिमान बाळगतात तर उरलेले कालबाह्य म्हणून टीका करतात.
वास्तविक हिंदू कालगणनेतील महिन्यांची नावे आणि शालिवाहन शकातील वर्षाचा क्रमांक राष्ट्रीय कालगणनेमध्ये स्विकारला आहे याव्यतिरिक्त दोहोंमध्ये काहीही साम्य नाही.
काय आहे भारतीय राष्ट्रीय कालगणना आणि हिंदू कालगणना यातील फरक?
१) कालगणनेची सुरुवात:
हिंदू कालगणना प्राचीन आहे.
हिंदू कालगणनेनुसार हे ५१२२ वे वर्ष सुरू आहे. त्याखेरीज अनेक हिंदू राजांनी त्यांच्या राजवटीत नवीन हिंदू कालगणना सुरू केल्या आहेत.
शालिवाहन शकचे हे १९४२ वे वर्ष तर विक्रम संवत्सरचे हे २०७६ वर्ष आहे.
अगदी अलीकडे सुरु झालेली हिंदू कालगणना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरु केलेली हिंदू कालगणना.
भारतीय राष्ट्रीय कालगणना ही अद्ययावत (Latest/ Modern) असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरु करण्यात आली.
संपूर्ण भारतात एक सामायिक कालगणना असावी जी उपयोगात आणण्यास सोपी आणि दोषमुक्त असेल ह्या विचाराने डॉ मेघनाद साहा ह्या खगोलभौतिकी शास्त्रज्ञ असलेल्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली कँलेडर रिफॉर्म कमिटी स्थापन करण्यात आली. त्या समितीने विविध कँलेडरचा अभ्यास करुन खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रोक्त (Scientific) कँलेडर बनवले. तीच आपली राष्ट्रीय कालगणना.
२) आधार:
आपल्याला ज्ञात शालिवाहन शक असो वा विक्रम संवत्सर ..ही हिंदू कालगणना प्रामुख्याने चंद्राच्या स्थितीवर (तिथींवर) अवलंबून आहे.
मात्र भारतीय राष्ट्रीय कालगणना सुर्याच्या स्थितीवर (तारखेनुसार) अवलंबून आहे.
३) दिवस (दिनविशेष):
हिंदू कालगणना चंद्राच्या स्थितीवर म्हणजे कलेप्रमाणे असल्याने दिनविशेष अथवा दिवस तिथीने दर्शविला जातो. प्रत्यक्ष तिथी दिवसभरात केव्हाही संपली तरी सुर्योदयाला जी तिथी असेल ती त्या दिवसभर धरली जाते. नवीन दिवस सुर्योदयाला सुरु होतो. एखादी तिथी सूर्योदयानंतर सुरु होऊन पुढिल दिवशीच्या सुर्योदयापुर्वी संपली तर ती तिथी दोन्हिपैकी कोणत्याही दिवशी धरली न जाता तिचा क्षय झाला असे समजतात. तर एखादी तिथी पहिल्या दिवशी सुर्योदयापुर्वी सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर संपली तर दोन्ही दिवशीचा दिनविशेष तीच तिथी असल्याचे मानले जाते.
भारतीय राष्ट्रीय कँलेडर सौर (सुर्यावर) अवलंबून असल्याने दिनविशेष तारखेने दर्शविला जातो. मात्र दिवस सुर्योदयाप्रमाणे सुरु न होता रात्री १२ ह्या काल्पनिक वेळेला सुरु होतो.
४) महिनाः
हिंदू कँलेडर (कालगणना) मधील महिन्याचे दोन भाग आहेत. आमावस्येनंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल (शुध्द) पक्ष, तर पौर्णिमेनंतर च्या प्रतिपदेपासून आमावस्येपर्यंत वद्य (क्रूष्ण) पक्ष. दोन्ही पक्ष मिळून एकंदर ३० तिथी होतात. ह्या ३० तिथींचा एक महिना धरला जातो.
भारतीय राष्ट्रीय कँलेडर मध्ये तिथींचा संबंध नसुन ३० किंवा ३१ दिवसांचा एक महिना असतो.
५) वर्ष:
हिंदू कँलेडरमध्ये १२ महिन्यातील ३६० तिथी मिळून एक वर्ष पुर्ण होते. ज्याचा कालावधी साधारण ३५४ दिवसांचा असतो.
भारतीय राष्ट्रीय कँलेडरमध्ये ३१ दिवसांचे ५ सलग महिने आणि ३० दिवसांचे ७ महीने असे एकंदर ३६५ दिवसांचे एक वर्ष असते.
६) वर्षारंभ:
हिंदु कालगणनेनुसार ज्या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असते त्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस वर्षारंभाचा दिवस समजला जातो... ज्याला गुढीपाडवा असे म्हणतात.
भारतीय राष्ट्रीय कँलेडरचा वर्षारंभ हा त्या दिवशी असतो सामान्यतः ज्या दिवशी सुर्य विषुववृत्त ओलांडून ऊत्तर गोलार्धात प्रवेश करत असतो...अर्थातच ह्या दिवशी दिवस रात्र समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. ह्या दिवसानंतर सहा महिने ऊत्तर गोलार्धातील दिवस रात्री पेक्षा मोठा असतो.
७) मेळ:
हिंदू कालगणना हि चंद्राच्या स्थितीवर (कलेनुसार) अवलंबून असली तरी ह्या मध्ये सुर्याच्या स्थितीचाही विचार केला आहे. सुर्य आणि चंद्र यांच्या अवकाशातील नक्षत्र व रास ह्यांंच्या स्थितीचा खगोलशास्त्रावर आधारीत विचार करून हिंदू कँलेडर मध्ये शास्त्रोक्त पध्दतीने अधिक महीना धरला जाऊन चांंद्रवर्ष आणि सौरवर्षाचा मेळ घातला जातो.
भारतीय कँलेडर मध्ये चंद्राच्या स्थितीला महत्व दिले जात नाही. मात्र दर ४ वर्षांनी सुर्याच्या स्थितीमध् पडणाऱ्या अंतराचा मेळ घालण्यासाठी एक अधिक दिवस मिळवला जातो. त्यामुळे हे वर्ष ३६६ दिवसांचे असते ज्यामध्ये पहिले सलग ६ महिने ३१ दिवसांचे तर शेवटचे सलग ६ महिने ३० दिवसांचे असतात. ह्या वर्षाला लिपवर्षं असे म्हटले जाते.


















































