भारताच्या पश्चिम बाजूकडील पश्चिमी घाटातील पर्वतरांगा हा भारतालाच नव्हे तर जगाला मिळालेला अलौकिक ठेवा. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये असलेली जैवविविधता जगातील इतर पर्वतरांगाना क्वचितच लाभली असेल. संगमरवरी हिमालयसुद्धा ह्या बाबतीत सह्याद्रीपेक्षा कमनशिबीच!
पावसाळ्याच्या चार महिन्यात जलाभिषेक करणाऱ्या सह्यपर्वतरांगांवरील स्नानोदक एका बाजूने थेट बंगालच्या उपसागरात मिळते तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात मिळते.
शेकडो नद्या उपनद्याचा जन्म होणाऱ्या ह्या सह्याद्रीपासूनच लोणावळ्याजवळ उगम पावणारी उल्हास नदी जेमतेम १२५ किमी लांबीची. उल्हास नदीच्या दोन्ही तीरावर वाढत गेलेल्या शहरातील एक म्हणजे डोंबिवली!
उल्हास नदी केवळ डोंबिवलीच काय पण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या संपूर्ण महामुंबईला जीवन देत आहे. स्वातंत्रदिनानिमित्त उल्हास नदीची छोटी परिक्रमा करत तिला मानवंदना देण्यापेक्षा वेगळी काय उत्तम कल्पना असू शकते!
श्विनने म्हणूनच आज डोंबिवली- कल्याण-राजनोली-खारेगाव टोल-मुंब्रा- शिळ- मानपाडा- डोंबिवली असा छोटासा प्रदक्षिणा मार्ग निवडला. श्विनने मार्गक्रमण करायला सुरुवात करताच पर्जन्यराजही प्रसन्न झाला होता. डोंबिवली पश्चिमेकडून नवीन पुलामार्गे श्विन ९० फुटी रस्त्याला पोचली. पुढे पत्रिपुलाची एक बाजू मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे श्विनला मोकळा रस्ता मिळाला. दुर्गाडी पुलावर जाताच आज सुट्टी असल्याचा प्रत्यय आला. श्विनने अगदी आरामात कोनगाव गाठले.
कल्याणहुन भिवंडीकडे जाणाऱ्या महामार्गावरील कोनगाव येथील रस्त्याचा डावीकडील अर्धा भाग कधीकाळी अस्तित्वात तरी होता का याची शंका येत होती. साधारण २० फूट डावीकडील रस्त्याचा डावीकडील १० फूट रुंद असलेल्या भागाचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले होते. महामार्ग असूनही बराच भाग चक्क पेव्हरब्लॉक टाकून तयार केला होता. त्या पेव्हरब्लॉकचे भाग तुटल्याने रस्त्याचा मधला भाग आणि डावा भाग यामध्येही आपोआपच आणखी एक दुभाजकही तयार झाला होता. श्विनने रस्त्याच्या मधल्या भागातून वाट काढत सर्व अश्वशक्तीधारी दुचाकी, चारचाकी, बहुचाकी गाड्यांना मागे टाकले.
नाशिक ठाणे महामार्गाला लागल्यावर मात्र श्विनची सुटका झाली. त्या गुळगुळीत महामार्गावर श्विनचा वेग चांगलाच वाढला. दिवा वसई लोहमार्गावरील पूल पार करून ओवळी गावाच्या फाट्याला मागे टाकत श्विनने पहिला थांबा घेतला. क्षणभर विश्रांती घेत श्विनने गती घेतली. खारेगाव टोल आल्यावर आज मात्र ठाण्याकडे न जाता श्विन मुंब्रा शहराकडे वळली.
सुरुवातीला थोडा खराब रस्ता गेल्यावर मात्र श्विनला आनंदाचा धक्काच बसला. उत्तम काँक्रिटिकरण केलेला रस्ता श्विनचे स्वागत करत होता. त्या रस्त्याच्या डावीकडे खाडी तर उजवीकडे डोंगररांगा होत्या. खाडीचे विशाल पात्र मोहात पाडत होतेच पण उजवीकडील डोंगररांगा नजर खिळवून टाकत होते. त्या डोंगररांगांनी ल्यालेला हिरवा शालू खुलून दिसत होता. त्याबरोबरच शुभ्र ढगांचा मुकुटही डोंगररांगांना शोभून दिसत होता. सुदैवाने पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे मनसोक्त छायाचित्रण करणेही शक्य झाले होते. मुंब्रा डोंगररांगांचे वैभव टिपत श्विन क्षणाक्षणाला थांबत होती.
मुंब्रादेवीचे मंदिरही ढगांच्या दुलईत लपेटलेले होते. त्यामुळे मुंब्रादेवीचे दर्शन घेता येईल असे वाटत नव्हते. थोडे पुढे जात श्विनने मुंब्रा शहराकडे कूच करत उजवीकडे पाहिले आणि... मंदिराभोवतीची ढंगांची दुलई दूर करून मुंब्रादेवी श्विनला दर्शन देत होती. काश्मीरमध्ये एक म्हण आहे,'मुंबईका फॅशन और कश्मीरका मौसम, कब बदलेगा कोई बता नही सकता.'
हाच अनुभव मुंब्रा येथे येत होता. 'कश्मीरका मौसम' मुंब्रा येथेच अनुभवायला मिळत होता. मुंब्रादेवी मंदिराचे दर्शन झाल्यावर श्विनचा उत्साह आणखीच वाढला.
श्विन मुंब्रा शहरात पोचली. सकाळची वेळ असल्याने मुंब्रा शहरातील बाजार गजबजलेला नव्हता. स्वातंत्रदिनानिमित एकदोन ठिकाणी सुरु असलेले कार्यक्रमही रस्ता अडवणारे नव्हते. श्विनने तेज गतीने कौसा गाठले. तेथील छोटासा भाग वगळता मुंब्रा ते शिळ रस्ता उत्तम स्थितीत होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना (की नगरभक्षकांना?) रस्ते कसे असावेत याचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंब्रा येथे नेण्यास हरकत नसावी.
श्विनने चांगलाच वेग घेतला. मोकळा आणि खड्डेविरहित रस्ता मिळाल्याने कल्याण फाटा येथे वळून मानपाडा कधी गाठले हे समजलेही नाही. खरेतर, कोकणरत्न हा श्विनचा हक्काचा थांबा! पण आज मोकळ्या रस्त्यामुळे ते भानही श्विनला राहिले नव्हते. मात्र डोंबिवली शहरात शिरल्याबरोबर श्विनला स्वतःच्या शहरात शिरल्याचे 'धक्के' पावलोपावली जाणवू लागले. घरी पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे श्विन आणि श्विनस्वार झालेले अस्मादिक दोघेही चिखलाने यथेच्छ माखले होतो. घरी पोहोचताच सरकारी कृपेने पाइपद्वारे मिळालेल्या उल्हास नदिच्या पाण्यानेच शुचिर्भूत होऊन श्विन आणि अस्मादिकांनी उल्हास नदीच्या (अर्ध)परिक्रमेची सांगता केली
पावसाळ्याच्या चार महिन्यात जलाभिषेक करणाऱ्या सह्यपर्वतरांगांवरील स्नानोदक एका बाजूने थेट बंगालच्या उपसागरात मिळते तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात मिळते.
शेकडो नद्या उपनद्याचा जन्म होणाऱ्या ह्या सह्याद्रीपासूनच लोणावळ्याजवळ उगम पावणारी उल्हास नदी जेमतेम १२५ किमी लांबीची. उल्हास नदीच्या दोन्ही तीरावर वाढत गेलेल्या शहरातील एक म्हणजे डोंबिवली!
उल्हास नदी केवळ डोंबिवलीच काय पण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या संपूर्ण महामुंबईला जीवन देत आहे. स्वातंत्रदिनानिमित्त उल्हास नदीची छोटी परिक्रमा करत तिला मानवंदना देण्यापेक्षा वेगळी काय उत्तम कल्पना असू शकते!
श्विनने म्हणूनच आज डोंबिवली- कल्याण-राजनोली-खारेगाव टोल-मुंब्रा- शिळ- मानपाडा- डोंबिवली असा छोटासा प्रदक्षिणा मार्ग निवडला. श्विनने मार्गक्रमण करायला सुरुवात करताच पर्जन्यराजही प्रसन्न झाला होता. डोंबिवली पश्चिमेकडून नवीन पुलामार्गे श्विन ९० फुटी रस्त्याला पोचली. पुढे पत्रिपुलाची एक बाजू मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे श्विनला मोकळा रस्ता मिळाला. दुर्गाडी पुलावर जाताच आज सुट्टी असल्याचा प्रत्यय आला. श्विनने अगदी आरामात कोनगाव गाठले.
कल्याणहुन भिवंडीकडे जाणाऱ्या महामार्गावरील कोनगाव येथील रस्त्याचा डावीकडील अर्धा भाग कधीकाळी अस्तित्वात तरी होता का याची शंका येत होती. साधारण २० फूट डावीकडील रस्त्याचा डावीकडील १० फूट रुंद असलेल्या भागाचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले होते. महामार्ग असूनही बराच भाग चक्क पेव्हरब्लॉक टाकून तयार केला होता. त्या पेव्हरब्लॉकचे भाग तुटल्याने रस्त्याचा मधला भाग आणि डावा भाग यामध्येही आपोआपच आणखी एक दुभाजकही तयार झाला होता. श्विनने रस्त्याच्या मधल्या भागातून वाट काढत सर्व अश्वशक्तीधारी दुचाकी, चारचाकी, बहुचाकी गाड्यांना मागे टाकले.
नाशिक ठाणे महामार्गाला लागल्यावर मात्र श्विनची सुटका झाली. त्या गुळगुळीत महामार्गावर श्विनचा वेग चांगलाच वाढला. दिवा वसई लोहमार्गावरील पूल पार करून ओवळी गावाच्या फाट्याला मागे टाकत श्विनने पहिला थांबा घेतला. क्षणभर विश्रांती घेत श्विनने गती घेतली. खारेगाव टोल आल्यावर आज मात्र ठाण्याकडे न जाता श्विन मुंब्रा शहराकडे वळली.
सुरुवातीला थोडा खराब रस्ता गेल्यावर मात्र श्विनला आनंदाचा धक्काच बसला. उत्तम काँक्रिटिकरण केलेला रस्ता श्विनचे स्वागत करत होता. त्या रस्त्याच्या डावीकडे खाडी तर उजवीकडे डोंगररांगा होत्या. खाडीचे विशाल पात्र मोहात पाडत होतेच पण उजवीकडील डोंगररांगा नजर खिळवून टाकत होते. त्या डोंगररांगांनी ल्यालेला हिरवा शालू खुलून दिसत होता. त्याबरोबरच शुभ्र ढगांचा मुकुटही डोंगररांगांना शोभून दिसत होता. सुदैवाने पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे मनसोक्त छायाचित्रण करणेही शक्य झाले होते. मुंब्रा डोंगररांगांचे वैभव टिपत श्विन क्षणाक्षणाला थांबत होती.
मुंब्रादेवीचे मंदिरही ढगांच्या दुलईत लपेटलेले होते. त्यामुळे मुंब्रादेवीचे दर्शन घेता येईल असे वाटत नव्हते. थोडे पुढे जात श्विनने मुंब्रा शहराकडे कूच करत उजवीकडे पाहिले आणि... मंदिराभोवतीची ढंगांची दुलई दूर करून मुंब्रादेवी श्विनला दर्शन देत होती. काश्मीरमध्ये एक म्हण आहे,'मुंबईका फॅशन और कश्मीरका मौसम, कब बदलेगा कोई बता नही सकता.'
हाच अनुभव मुंब्रा येथे येत होता. 'कश्मीरका मौसम' मुंब्रा येथेच अनुभवायला मिळत होता. मुंब्रादेवी मंदिराचे दर्शन झाल्यावर श्विनचा उत्साह आणखीच वाढला.
श्विन मुंब्रा शहरात पोचली. सकाळची वेळ असल्याने मुंब्रा शहरातील बाजार गजबजलेला नव्हता. स्वातंत्रदिनानिमित एकदोन ठिकाणी सुरु असलेले कार्यक्रमही रस्ता अडवणारे नव्हते. श्विनने तेज गतीने कौसा गाठले. तेथील छोटासा भाग वगळता मुंब्रा ते शिळ रस्ता उत्तम स्थितीत होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना (की नगरभक्षकांना?) रस्ते कसे असावेत याचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंब्रा येथे नेण्यास हरकत नसावी.
श्विनने चांगलाच वेग घेतला. मोकळा आणि खड्डेविरहित रस्ता मिळाल्याने कल्याण फाटा येथे वळून मानपाडा कधी गाठले हे समजलेही नाही. खरेतर, कोकणरत्न हा श्विनचा हक्काचा थांबा! पण आज मोकळ्या रस्त्यामुळे ते भानही श्विनला राहिले नव्हते. मात्र डोंबिवली शहरात शिरल्याबरोबर श्विनला स्वतःच्या शहरात शिरल्याचे 'धक्के' पावलोपावली जाणवू लागले. घरी पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे श्विन आणि श्विनस्वार झालेले अस्मादिक दोघेही चिखलाने यथेच्छ माखले होतो. घरी पोहोचताच सरकारी कृपेने पाइपद्वारे मिळालेल्या उल्हास नदिच्या पाण्यानेच शुचिर्भूत होऊन श्विन आणि अस्मादिकांनी उल्हास नदीच्या (अर्ध)परिक्रमेची सांगता केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा