पर्शियन राजा जमशेद याने सुरु केलेल्या पारशी कॅलेंडर वर्षाचा आज पहिला दिवस- जमशेद- ए- नवरोज अर्थात - पतेती. त्यानिमित्त मिळालेल्या सुट्टीचा उपभोग घेत फिरण्यासाठी श्विनचे विचारचक्र दोन दिवस सुरु होते. संजय दात्ये आणि अभय कुलकर्णी यांनाही विचारून झाले. मात्र दोघांनाही वेळ नसल्याने श्विनने 'एकला चालो रे' ची तयारी ठेवली होती.
पहाटे नेहमीपेक्षा लवकरच म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरच जाग अली. मात्र रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे अस्मादिक बाहेर पडायला तयार होत नव्हते. वातावरण ढगाळ होते. श्विनला बाहेर जायचा उत्साह असला तरी अस्मादिकांनी जास्तीत जास्त वेळ घालवला. अखेरीस श्विनच्या इच्छेपुढे हार मानत आमची दौड सुरु झाली. अर्थात एक पेडल मारल्याबरोबर श्विनबरोबर अस्मादिकांनाही स्फुरण चढले.
सम्राट चौक, लोहमार्गावरून जाणारा पूल पार करत पूर्वेला पोचलो तरी कुठे जायचे ते ठरत नव्हते. टंडन रस्त्याहुन राजेंद्रप्रसाद रस्त्याला न वळता श्विन सरळ भोपरच्या दिशेने निघाली. तरी श्विनच्या मनात काय आहे हे कळत नव्हते. मी मात्र शांत होतो. भोपरहून श्विन मानपाडा रस्त्याला लागली. मानपाडा रस्ता संपताच डावीकडे वळत शिळ कल्याण महामार्गामार्फत ९० फुटी रस्ता आणि परत घरी असा प्रस्ताव मी श्विनपुढे ठेवला. मात्र श्विनच्या मनात काही वेगळाच विचार होता. मानपाडा रस्ता संपताच श्विनने डावीकडे वळण घेण्याऐवजी उजवीकडे वळण घेतले.
आता पुन्हा दोन पर्याय होते. बदलापूर पाइपलाइन रस्ता की थेट शिळ फाटा. खड्डे पडलेल्या बदलापूर पाइपलाइन रस्त्यापेक्षा श्विनने शिळ फाट्याकडे जाणारा वाहनांच्या गर्दीचा रस्ता निवडला. शिळ फाट्याला U आकाराचे वळण घेत घरी परतायचे मी ठरवले. शिळ फाटा येथे वाहनांच्या रांगा मध्ये अडकल्यावर अचानक पुढील खिंडीतील गणेश घोळ मंदिरकडे जायचा विचार मनात आला. खिंडीतील चढावर श्विनला दामटवत आम्ही गणेश घोळ मंदिराशी पोचलो. खरतर तेथून लगेच परतायचा विचार होता. पण आजूबाजूच्या निसर्गाने मला मोहिनी घातली. मी श्विनबरोबर मंदिराकडे वळलो.
मंदिराचा फलक आमचे स्वागत करत होता. काही पायऱ्या वर जात होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी बहरली होती. मंदिराच्या पायथ्यापासूनच परत जायचे ठरवले असले तरी आजूबाजूचा निसर्ग परत फिरू देत नव्हता. मग मी श्विनला उचलून घेत काही पायऱ्या चढून परत फिरायचे ठरवले. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर दृश्य दिसत होते. छोटी फुलपाखरे, फुले पाहताना आणखी काही पायऱ्या चढण्याचा मोह आवरत नव्हता. पक्ष्यांचे मंजुळ गान मला मंदिराकडे खेचून नेत होते. एका हातात श्विन आणि फोटो काढण्यासाठी एका हातात मोबाइल असा सज्ज होत मी पायऱ्या चढत होतो. नागमोडी वळणाने वर जाणाऱ्या पायऱ्या माझे कुतूहल वाढवत होत्या. त्या पायऱ्या चढत वर जाताना प्रसन्न वाटत होते. वाटेतील निसर्ग टिपत क्षणाक्षणाला थांबत मी मंदिराच्या दिशेने जात होतो. मंदिराजवळील शेवटच्या टप्प्यात एका वटवृक्षाच्या पारंब्या पसरलेल्या दिसल्या.
मंदिराजवळ जाताच समोर एक आश्रम दिसला. बाहेरच नळापाशी एक साधू लंगोटीवरच हातपाय धुवत होता. तेथेच समोर एक आश्रम होता. तेथेही एक साधू बसला होता. मी श्विनला तिथेच उभे केले आणि शिरस्त्राण, बूट काढले. आश्रमातील साधूने मला हातपाय धुवायला सांगितले तेव्हा मला शेजारी आणखी एक नळ दिसला. तेथील गार पाण्याने हातपाय आणि तोंड धुवून मी ताजातवाना झालो. मंदिर छोटेसे होते. एक साधू मंदिरात पूजा करत होता. मंदिराभोवतीचा परिसर अतिशय स्वच्छ केलेला होता. त्या प्रसन्न वातावरणातून माघारी फिरण्याची इच्छा होणे अशक्यच होते. गाभाऱ्यातील मूर्ती प्रसन्न होतीच शिवाय गाभाराही लख्ख केला होता.
कल्याण-शिळ रस्त्यावरील जवळ असूनही प्रदूषणापासून सुटका झाल्याचे समाधान मिळत होते. येथे आल्यावर थकलेले अंग पुन्हा ताजेतवाने झाले होते. किमान सव्वाशे दीडशे पायऱ्या असतील, पण त्या चढताना अजिबात दमायला होत नाही. घनदाट झाडी आणि डेरेदार वृक्ष बाजूला असल्याने गारवा वाटतो. एकेक पायरी चढताना आजूबाजूची अनेक फुलझाडे, वेगळय़ा प्रकारचे वृक्ष न्याहाळत आपण पुढे पुढे जात राहतो.. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर आपण डोंगरावरील मंदिरापर्यंत पोहोचतो. हे मंदिर अगदी साधेसुधे असून अगदी लहान आकाराचे आहे. मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. एक भाग दगडाच्या खोबणीत बसविला आहे.. या मोठय़ा दगडातही कोरून काही शेंदूर फासलेल्या मूर्त्यां बसविण्यात आल्या आहेत.
मंदिराचा परिसरही अतिशय सुंदर आणि ताजातवाना करणारा आहे. पण या मंदिराच्या बाजूला काही साधूंनी त्यांचे आश्रम उभारले असल्याने परिसर अतिशय रमणीय आणि मन प्रसन्न करणारा आहे.
मंदिरात दर्शन घेऊन आणि थोडावेळ थांबून मी परत निघालो तरी लंगोटीधारी साधू अजूनही नळापाशी हातपाय धुण्यातच दंग होता.
मी पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत काही वेगवेगळय़ा प्रकारची फुले पाहायला मिळतात, तर काही वेगळय़ाच वनस्पती आढळतात. त्यामुळे येथे छायाचित्रे काढण्याचा मोह आवरता येत नाही. पायऱ्या उतरताना आपण पुन्हा या वनस्पती न्याहाळू लागतो. त्यामुळे पुन्हा अर्थातच एका हातात श्विन आणि एका हातात मोबाइल सज्ज करत मी पायऱ्या उतरू लागलो. निसर्ग इतका मोहवीत होता की प्रत्येक पायरीवर थांबत आजूबाजूचे दृश्य टिपावेसे वाटत होते. पक्ष्याच्या आवाजानेही पाय थबकत होते. मंदिराच्या पायऱ्या उतरून मी श्विनला सज्ज केले, तरीही तेथून पाय निघत नव्हता. मी श्विनकडे वळलो की एखादे सुंदर फुल, फुलपाखरू किंवा सुंदर पक्षी दिसत होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा थबकत होतो.
निसर्गाच्या ह्या लिलांमध्ये वेळ कसा जात होता हे समजत नव्हते. खरेतर निसर्गाने माझ्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. सर्व भान विसरून मीही त्या दुनियेत हरवलो होतो. अखेरीस मी श्विनकडे मोहरा वळवला आणि पुन्हा निसर्गसंपन्न परिसरापासून कृत्रिम जगतात परत फिरलो.
पहाटे नेहमीपेक्षा लवकरच म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरच जाग अली. मात्र रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे अस्मादिक बाहेर पडायला तयार होत नव्हते. वातावरण ढगाळ होते. श्विनला बाहेर जायचा उत्साह असला तरी अस्मादिकांनी जास्तीत जास्त वेळ घालवला. अखेरीस श्विनच्या इच्छेपुढे हार मानत आमची दौड सुरु झाली. अर्थात एक पेडल मारल्याबरोबर श्विनबरोबर अस्मादिकांनाही स्फुरण चढले.
सम्राट चौक, लोहमार्गावरून जाणारा पूल पार करत पूर्वेला पोचलो तरी कुठे जायचे ते ठरत नव्हते. टंडन रस्त्याहुन राजेंद्रप्रसाद रस्त्याला न वळता श्विन सरळ भोपरच्या दिशेने निघाली. तरी श्विनच्या मनात काय आहे हे कळत नव्हते. मी मात्र शांत होतो. भोपरहून श्विन मानपाडा रस्त्याला लागली. मानपाडा रस्ता संपताच डावीकडे वळत शिळ कल्याण महामार्गामार्फत ९० फुटी रस्ता आणि परत घरी असा प्रस्ताव मी श्विनपुढे ठेवला. मात्र श्विनच्या मनात काही वेगळाच विचार होता. मानपाडा रस्ता संपताच श्विनने डावीकडे वळण घेण्याऐवजी उजवीकडे वळण घेतले.
आता पुन्हा दोन पर्याय होते. बदलापूर पाइपलाइन रस्ता की थेट शिळ फाटा. खड्डे पडलेल्या बदलापूर पाइपलाइन रस्त्यापेक्षा श्विनने शिळ फाट्याकडे जाणारा वाहनांच्या गर्दीचा रस्ता निवडला. शिळ फाट्याला U आकाराचे वळण घेत घरी परतायचे मी ठरवले. शिळ फाटा येथे वाहनांच्या रांगा मध्ये अडकल्यावर अचानक पुढील खिंडीतील गणेश घोळ मंदिरकडे जायचा विचार मनात आला. खिंडीतील चढावर श्विनला दामटवत आम्ही गणेश घोळ मंदिराशी पोचलो. खरतर तेथून लगेच परतायचा विचार होता. पण आजूबाजूच्या निसर्गाने मला मोहिनी घातली. मी श्विनबरोबर मंदिराकडे वळलो.
मंदिराचा फलक आमचे स्वागत करत होता. काही पायऱ्या वर जात होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी बहरली होती. मंदिराच्या पायथ्यापासूनच परत जायचे ठरवले असले तरी आजूबाजूचा निसर्ग परत फिरू देत नव्हता. मग मी श्विनला उचलून घेत काही पायऱ्या चढून परत फिरायचे ठरवले. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर दृश्य दिसत होते. छोटी फुलपाखरे, फुले पाहताना आणखी काही पायऱ्या चढण्याचा मोह आवरत नव्हता. पक्ष्यांचे मंजुळ गान मला मंदिराकडे खेचून नेत होते. एका हातात श्विन आणि फोटो काढण्यासाठी एका हातात मोबाइल असा सज्ज होत मी पायऱ्या चढत होतो. नागमोडी वळणाने वर जाणाऱ्या पायऱ्या माझे कुतूहल वाढवत होत्या. त्या पायऱ्या चढत वर जाताना प्रसन्न वाटत होते. वाटेतील निसर्ग टिपत क्षणाक्षणाला थांबत मी मंदिराच्या दिशेने जात होतो. मंदिराजवळील शेवटच्या टप्प्यात एका वटवृक्षाच्या पारंब्या पसरलेल्या दिसल्या.
मंदिराजवळ जाताच समोर एक आश्रम दिसला. बाहेरच नळापाशी एक साधू लंगोटीवरच हातपाय धुवत होता. तेथेच समोर एक आश्रम होता. तेथेही एक साधू बसला होता. मी श्विनला तिथेच उभे केले आणि शिरस्त्राण, बूट काढले. आश्रमातील साधूने मला हातपाय धुवायला सांगितले तेव्हा मला शेजारी आणखी एक नळ दिसला. तेथील गार पाण्याने हातपाय आणि तोंड धुवून मी ताजातवाना झालो. मंदिर छोटेसे होते. एक साधू मंदिरात पूजा करत होता. मंदिराभोवतीचा परिसर अतिशय स्वच्छ केलेला होता. त्या प्रसन्न वातावरणातून माघारी फिरण्याची इच्छा होणे अशक्यच होते. गाभाऱ्यातील मूर्ती प्रसन्न होतीच शिवाय गाभाराही लख्ख केला होता.
कल्याण-शिळ रस्त्यावरील जवळ असूनही प्रदूषणापासून सुटका झाल्याचे समाधान मिळत होते. येथे आल्यावर थकलेले अंग पुन्हा ताजेतवाने झाले होते. किमान सव्वाशे दीडशे पायऱ्या असतील, पण त्या चढताना अजिबात दमायला होत नाही. घनदाट झाडी आणि डेरेदार वृक्ष बाजूला असल्याने गारवा वाटतो. एकेक पायरी चढताना आजूबाजूची अनेक फुलझाडे, वेगळय़ा प्रकारचे वृक्ष न्याहाळत आपण पुढे पुढे जात राहतो.. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर आपण डोंगरावरील मंदिरापर्यंत पोहोचतो. हे मंदिर अगदी साधेसुधे असून अगदी लहान आकाराचे आहे. मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. एक भाग दगडाच्या खोबणीत बसविला आहे.. या मोठय़ा दगडातही कोरून काही शेंदूर फासलेल्या मूर्त्यां बसविण्यात आल्या आहेत.
मंदिराचा परिसरही अतिशय सुंदर आणि ताजातवाना करणारा आहे. पण या मंदिराच्या बाजूला काही साधूंनी त्यांचे आश्रम उभारले असल्याने परिसर अतिशय रमणीय आणि मन प्रसन्न करणारा आहे.
मंदिरात दर्शन घेऊन आणि थोडावेळ थांबून मी परत निघालो तरी लंगोटीधारी साधू अजूनही नळापाशी हातपाय धुण्यातच दंग होता.
मी पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत काही वेगवेगळय़ा प्रकारची फुले पाहायला मिळतात, तर काही वेगळय़ाच वनस्पती आढळतात. त्यामुळे येथे छायाचित्रे काढण्याचा मोह आवरता येत नाही. पायऱ्या उतरताना आपण पुन्हा या वनस्पती न्याहाळू लागतो. त्यामुळे पुन्हा अर्थातच एका हातात श्विन आणि एका हातात मोबाइल सज्ज करत मी पायऱ्या उतरू लागलो. निसर्ग इतका मोहवीत होता की प्रत्येक पायरीवर थांबत आजूबाजूचे दृश्य टिपावेसे वाटत होते. पक्ष्याच्या आवाजानेही पाय थबकत होते. मंदिराच्या पायऱ्या उतरून मी श्विनला सज्ज केले, तरीही तेथून पाय निघत नव्हता. मी श्विनकडे वळलो की एखादे सुंदर फुल, फुलपाखरू किंवा सुंदर पक्षी दिसत होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा थबकत होतो.
निसर्गाच्या ह्या लिलांमध्ये वेळ कसा जात होता हे समजत नव्हते. खरेतर निसर्गाने माझ्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. सर्व भान विसरून मीही त्या दुनियेत हरवलो होतो. अखेरीस मी श्विनकडे मोहरा वळवला आणि पुन्हा निसर्गसंपन्न परिसरापासून कृत्रिम जगतात परत फिरलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा