भारतीय राष्ट्रीय दिनांक १० पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक ३१ डिसेंम्बर २०१९
आजचा दिवस श्विनसाठी खुपच महत्वाचा होता. कारण एक- दोन नव्हे तर श्विनच्या तब्बल सहा मित्रांचा आज सौर कालगणनेनुसार वाढदिवस होता. आणि तोही सगळ्या सहा जणांचा ५० वा वाढदिवस होता. मात्र आज श्विन ह्या सगळ्यांपासून हजार किमी दुर होता. श्विनला जाग आली ती ह्या सहाही मित्रांच्या आठवणीबरोबरच!
थंडी चांगलीच जाणवत होती. मात्र राजस्थानमध्ये भेटलेल्या मित्रांनी त्या थंडीपासून संरक्षण करण्याचा उपाय सांगितला होता. आधीच कळल्याप्रमाणे एकदोन जाड कपडे घालण्याऐवजी थोडे पातळ का असेना पण कपड्यांचे जास्त थर घालत होतो. त्यात नवीन माहिती मिळाली की कपड्यांच्या दोन थरांमध्ये कागद ठेवायचा. कपड्यांतून थंडी आत सरकते, मात्र कागदातून तेवढ्या प्रमाणात थंडी आत सरकत नाही. ही अनमोल माहिती कळल्यामुळे कपड्यांचे थर चढवत असता दोन थरांमध्ये वर्तमानपत्राचे कागदही संरक्षक कवच म्हणून आम्ही चढवत होतो. हॉटेलमध्ये चहा मिळणार नसल्याने आम्ही हॉटेल सोडून रस्त्यावर आलो खरे, पण लगेचच थंडी आमचा ताबा घेऊ लागली. आमचे हॉटेल मेडता रोडचा फलाट संपल्यावर लोहमार्गाला समांतर थोड्याच अंतरावर होते. आम्ही सायकलवायला सुरुवात करण्याअगोदरच आमचे लक्ष लोहमार्गापलिकडे असलेल्या उजेडाकडे गेले. लांंबुन तो नक्की कसला उजेड आहे ते कळत नव्हते. आमचा मुक्काम महामार्गानजीक नसल्याने पुढील रस्त्याची एकदा खात्रीही करायची होती.
पहाटेच्या अंधारात त्या लांबवर दिसणाऱ्या उजेडाकडे गेलो. ओहोहो, ते तर चहाकेन्द्र होते. तेथे शेकोटीही होती. चहाएवढीच त्या शेकोटीचीही गरज वाटत होती.
शेकोटीवर हात शेकल्यावर हाताला बोटं असल्याची जाणीव व्हायला लागली. चहा पिता पिता तेथील लोकांना आजचा रस्ता विचारून घेतला. त्यांनी लोहमार्गाला लागून असलेला एक रस्ता सांगितला. तो मेडता रोड स्थानकाला लागून जात होता. आम्हाला माहीत असलेल्या रस्त्यापेक्षा हा रस्ता अरुंद असला तरी जवळपास २० किमी अंतर वाचवणारा आहे, असे तेथील लोकांनी सांगितले. आम्ही २० किमी वाचवण्यासाठी अरुंद रस्त्याने जाणे स्विकारले.
मेडता रोड स्थानक मागे पडल्यावर एक डावे वळण घेत आम्ही लोहमार्ग ओलांडला. पूढील रस्ता अरुंद असला तरी सुंदर होता. आजुबाजुला हिरवळ चादर पसरली होती.
भास्कर क्षितीजावर येत होता. वातावरणातील गारवा सुखद वाटू लागला होता. श्विन(फुजी)ने आघाडी घेतली होती. ट्रेक, रसिकभाई, मोहित पाठोपाठच होते. १०-१५ फुट मागोमाग इतर सायकलस्वार होते. आम्ही जारोडाकडे जात होतो. रस्ता मोकळा असल्याने वेग वाढत होता. इतक्यात रस्त्याच्या डावीकडून रस्ता ओलांडत हरणांचे एक पथक दौडत गेले. त्यांची ती डौलदार धाव पाहताच आम्ही मंत्रमुग्ध झालो. दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती.
जारोडाहून आम्ही बुटाटीच्या दिशेने जाऊ लागलो. आता कच्चा रस्ता लागला होता. आमचा वेग मंदावला होता. आणि अचानक तो शुन्यवतच झाला. निसर्ग आमच्यावर चांगलाच प्रसन्न झाला होता. त्या सोनेरी वातावरणात डावीकडे मोरांचा थवाच विहार करत होता. तर रस्त्याच्या डावीकडे एक झाड पोपटांच्या थव्याने अक्षरशः लगडलेले होते.
पक्ष्यांचा राजा शांतपणे विहरत असताना पोपटांचा कल्लोळ मात्र अविरतपणे सुरु होता. काय संभाषण करत होते कोण जाणे! कदाचित मोरांचा रूबाब त्यांना सहन होत नसावा. किंवा आमचे लक्ष मोरांवरून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत असावेत. त्या मोहक वातावरणातून पुढे जायला मन तयार होत नव्हते. थोड्या नाखुषीनेच आम्ही पुढे जाऊ लागलो.
बूटाटी जवळ आल्याची जाणीव होताच आम्ही चहाकेंद्राची चौकशी करू लागलो. स्टेशनजवळ चहाकेंद्र असल्याचे समजले. आम्ही स्टेशनची चौकशी करत जात असताना एका हमरस्त्याला लागलो. तिथे समोरच चहा केंद्र दिसले. तिथे स्टेशनची चौकशी केली तर तेथील लोक सांगु लागले की तेच स्टेशन होते. आम्ही गोंधळात पडलो. आम्हाला स्टेशनचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. ना फलाट ना लोहमार्ग.. ...
थोड्या वेळात उलगडा झाला तिथे रेलस्टेशन नव्हे, बसस्टेशन होते. हमरस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बस थांबत होत्या. आम्ही चहा बरोबर नाश्ताही करुन घेतला.
तो हमरस्ता बूटाटीहुन नागौरकडे जाणारा होता. चहा, नाश्ता झाल्यावर सायकलस्वारांनी नागौरची दिशा धरली. थोडे अंतर गेल्यावर ऊजवे वळण घ्यायचे होते. फुजी(श्विन), देवधर, मोहित आणि अय्यर ह्यांनी आघाडी घेतली. बाकी सायकलस्वार थोडे मागे राहिले होते. एवढ्यात ऊजवीकडे जाणारा एक अरूंद रस्ता दिसला. फुजी(श्विन) हेच वळण घ्यायचे आहे का, याची गुगलकाकांंकडे चौकशी करत असताना अय्यर, मोहित आणि देवधर पुढे जाऊ लागले. श्विनने त्यांना थांबायला सांगितले. अय्यर आणि मोहित एव्हाना थोडे पुढे गेले असल्याने त्यांंना ते ऐकू आले नाही. सरळ जाणारा रस्ता नागौरकडे जाणारा महामार्ग असल्याने प्रशस्त होता, तर उजवीकडे वळणारा रस्ता अरुंद होता. देवधर श्विनच्या हाकेकडे दुर्लक्ष करत सरळ निघुन गेले. गुगलकाका मात्र ऊजवे वळण घ्यायला सांगत होते. अखेरीस मागे राहीलेल्या सायकलपटूंची वाट पहात फुजी(श्विन)ने तेथेच थांबायचा निर्णय घेतला.
महामार्गाच्या हव्यासापोटी नागौरमार्गे तब्बल ५०-६० किमी अंतर वाढणार होते. मागील सायकलपटू लगेचच आले. त्यांच्याबरोबर गौतमचा टेम्पोही होता. लगेचच गौतमला चुकीच्या दिशेने दौडत निघालेल्या तिघांना परत आणण्यासाठी पाठवले. सगळे परत आल्यावर आम्ही महामार्ग सोडून उजवे वळण घेतले. एव्हाना सगळ्या गोंधळात अर्धा तास तरी निघून गेला होता. मग मात्र आम्ही ते ऊजवे वळण घेत कुचेरा (कुचखेडा)मार्गे कसनाऊ-देहरी-तरनू कडे वळलो. छोट्या गावातून जाणारा रस्ता अरुंद असणे स्वाभाविक असले तरी आता आम्हाला त्याची सवय झाली होती. खरतरं रस्ता खेड्यातील गल्लीएवढा अरूंद झाला होता. मध्यान्हं झाली होती. आम्ही एका छोट्या गावात शिरलो. तिथे चहाची चौकशी करताना मोठ्या मुश्किलीने एक चहा केंद्र सापडले. फुजी(श्विन), ट्रेक, नयना आघारकर चहा घेत असताना आसाभाईंनी रस्त्यात बैठक मारून मेळावा भरवला होता. तेथील कोपऱ्यावर एक कळकट, अंधारे दुकान होते. कसं कोण जाणे सायकलस्वारांना ते मिठाईचे दुकान असल्याचा शोध लागला. दुकानदाराने अस्सल खव्यापासून बनवलेला एक पदार्थ खायला दिला. ओहोहो, गरम गरम बनवलेला तो पदार्थ खाताच सगळ्यांच्याच जीभेला पाणी सुटले. हा, हा म्हणता दुकानातील माल संपला. गाव छोटे असल्याने त्या गावाच्या मानाने खरेदीसाठी कदाचित तो पुरेसा असला तरी त्याचा चट्टामट्टा झाला होता. तेथील लोक त्याला रबडी म्हणत होते. (मात्र आपल्याकडे मिळणारी रबडी ही नव्हे). आम्ही फर्माईश करताच दुकानदाराने पुन्हा एकदा खव्याची ती गरमागरम पाककृती आम्हाला सादर केली.
तेथून निघालो तेव्हा गावकरी आमच्याभोवती कोंडाळे करून ऊभे राहिले होते. त्यांना आम्ही कोणीतरी परग्रहवासीच वाटत होतो. त्या कोंडाळ्यातुन सुटका करत आम्ही पुढील मार्गाला लागलो. वाटेत वन्य पशु पक्षी दर्शन देत होते.
तरनू गाव पार करुन आम्ही नागौर- डीडवाना हमरस्त्याला लागलो. Butterflies in stomach म्हणा की पेटमे चूहे म्हणा की पोटातले कावळे म्हणा ... सगळेच दंगा करु लागले होते. त्यामुळे हमरस्त्याला लागताच एक धाबा पाहून तिथे जठराग्नीला आहुती दिली. ती फुलपाखरे, उंदीर आणि कावळे शांत झाल्यावर आम्ही पुन्हा कुच केले. एव्हाना २.३० वाजले होते आणि आजचे ५५ किमी अंतर बाकी होते. मात्र आता पुढील संपूर्ण मार्ग हा प्रशस्त हमरस्त्याचा होता.
हा हमरस्ता असला तरी गावे एकमेकांपासून दूरदूर आणि छोटी, कमी लोकवस्तीची होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वन्य प्राणी- पक्षी दिसत होते. मोकळ्या हमरस्त्यावरून वेगाने रस्ता ओलांडणाऱ्या निलगायी पाहताना रोमांच ऊभे राहात होते. मोर तर अगदी मुबलक प्रमाणात दिसत होते. एका गोष्टीचे मात्र वाईट वाटत होते की मोर वगळता इतर कोणालाही छायाचित्रबध्द मात्र करता येत नव्हते.
वाटेत पुन्हा दोन वेळा चहा पान करत आम्ही डीडवानाकडे दौडत असताना एका गावाच्या नावाची पाटी पाहून आमचे चांगलेच मनोरंजन झाले.
डीडवाना येथे गंतव्यस्थानी पोहोचेपर्यंत भास्कराचार्य आजचा कारभार आवरता घेऊ लागले होते. अस्मादिकांना आज फुजी साथ करत असली तरी शैलेशभाईंंनी आज टेम्पोमध्ये कमी वेळ घालवून श्विनवरच बऱ्यापैकी वेळ घालवला होता. त्यामुळे फुजी आणि श्विन दोघेही एकसमयावच्छेदे दौड करत असल्याचा दुर्मिळ योग आज आला होता.
युरोपियन ख्रिस्ती दिनांक ३१ डिसेंम्बर २०१९
आजचा दिवस श्विनसाठी खुपच महत्वाचा होता. कारण एक- दोन नव्हे तर श्विनच्या तब्बल सहा मित्रांचा आज सौर कालगणनेनुसार वाढदिवस होता. आणि तोही सगळ्या सहा जणांचा ५० वा वाढदिवस होता. मात्र आज श्विन ह्या सगळ्यांपासून हजार किमी दुर होता. श्विनला जाग आली ती ह्या सहाही मित्रांच्या आठवणीबरोबरच!
थंडी चांगलीच जाणवत होती. मात्र राजस्थानमध्ये भेटलेल्या मित्रांनी त्या थंडीपासून संरक्षण करण्याचा उपाय सांगितला होता. आधीच कळल्याप्रमाणे एकदोन जाड कपडे घालण्याऐवजी थोडे पातळ का असेना पण कपड्यांचे जास्त थर घालत होतो. त्यात नवीन माहिती मिळाली की कपड्यांच्या दोन थरांमध्ये कागद ठेवायचा. कपड्यांतून थंडी आत सरकते, मात्र कागदातून तेवढ्या प्रमाणात थंडी आत सरकत नाही. ही अनमोल माहिती कळल्यामुळे कपड्यांचे थर चढवत असता दोन थरांमध्ये वर्तमानपत्राचे कागदही संरक्षक कवच म्हणून आम्ही चढवत होतो. हॉटेलमध्ये चहा मिळणार नसल्याने आम्ही हॉटेल सोडून रस्त्यावर आलो खरे, पण लगेचच थंडी आमचा ताबा घेऊ लागली. आमचे हॉटेल मेडता रोडचा फलाट संपल्यावर लोहमार्गाला समांतर थोड्याच अंतरावर होते. आम्ही सायकलवायला सुरुवात करण्याअगोदरच आमचे लक्ष लोहमार्गापलिकडे असलेल्या उजेडाकडे गेले. लांंबुन तो नक्की कसला उजेड आहे ते कळत नव्हते. आमचा मुक्काम महामार्गानजीक नसल्याने पुढील रस्त्याची एकदा खात्रीही करायची होती.
पहाटेच्या अंधारात त्या लांबवर दिसणाऱ्या उजेडाकडे गेलो. ओहोहो, ते तर चहाकेन्द्र होते. तेथे शेकोटीही होती. चहाएवढीच त्या शेकोटीचीही गरज वाटत होती.
शेकोटीवर हात शेकल्यावर हाताला बोटं असल्याची जाणीव व्हायला लागली. चहा पिता पिता तेथील लोकांना आजचा रस्ता विचारून घेतला. त्यांनी लोहमार्गाला लागून असलेला एक रस्ता सांगितला. तो मेडता रोड स्थानकाला लागून जात होता. आम्हाला माहीत असलेल्या रस्त्यापेक्षा हा रस्ता अरुंद असला तरी जवळपास २० किमी अंतर वाचवणारा आहे, असे तेथील लोकांनी सांगितले. आम्ही २० किमी वाचवण्यासाठी अरुंद रस्त्याने जाणे स्विकारले.
मेडता रोड स्थानक मागे पडल्यावर एक डावे वळण घेत आम्ही लोहमार्ग ओलांडला. पूढील रस्ता अरुंद असला तरी सुंदर होता. आजुबाजुला हिरवळ चादर पसरली होती.
भास्कर क्षितीजावर येत होता. वातावरणातील गारवा सुखद वाटू लागला होता. श्विन(फुजी)ने आघाडी घेतली होती. ट्रेक, रसिकभाई, मोहित पाठोपाठच होते. १०-१५ फुट मागोमाग इतर सायकलस्वार होते. आम्ही जारोडाकडे जात होतो. रस्ता मोकळा असल्याने वेग वाढत होता. इतक्यात रस्त्याच्या डावीकडून रस्ता ओलांडत हरणांचे एक पथक दौडत गेले. त्यांची ती डौलदार धाव पाहताच आम्ही मंत्रमुग्ध झालो. दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती.
जारोडाहून आम्ही बुटाटीच्या दिशेने जाऊ लागलो. आता कच्चा रस्ता लागला होता. आमचा वेग मंदावला होता. आणि अचानक तो शुन्यवतच झाला. निसर्ग आमच्यावर चांगलाच प्रसन्न झाला होता. त्या सोनेरी वातावरणात डावीकडे मोरांचा थवाच विहार करत होता. तर रस्त्याच्या डावीकडे एक झाड पोपटांच्या थव्याने अक्षरशः लगडलेले होते.
पक्ष्यांचा राजा शांतपणे विहरत असताना पोपटांचा कल्लोळ मात्र अविरतपणे सुरु होता. काय संभाषण करत होते कोण जाणे! कदाचित मोरांचा रूबाब त्यांना सहन होत नसावा. किंवा आमचे लक्ष मोरांवरून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत असावेत. त्या मोहक वातावरणातून पुढे जायला मन तयार होत नव्हते. थोड्या नाखुषीनेच आम्ही पुढे जाऊ लागलो.
बूटाटी जवळ आल्याची जाणीव होताच आम्ही चहाकेंद्राची चौकशी करू लागलो. स्टेशनजवळ चहाकेंद्र असल्याचे समजले. आम्ही स्टेशनची चौकशी करत जात असताना एका हमरस्त्याला लागलो. तिथे समोरच चहा केंद्र दिसले. तिथे स्टेशनची चौकशी केली तर तेथील लोक सांगु लागले की तेच स्टेशन होते. आम्ही गोंधळात पडलो. आम्हाला स्टेशनचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. ना फलाट ना लोहमार्ग.. ...
थोड्या वेळात उलगडा झाला तिथे रेलस्टेशन नव्हे, बसस्टेशन होते. हमरस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बस थांबत होत्या. आम्ही चहा बरोबर नाश्ताही करुन घेतला.
तो हमरस्ता बूटाटीहुन नागौरकडे जाणारा होता. चहा, नाश्ता झाल्यावर सायकलस्वारांनी नागौरची दिशा धरली. थोडे अंतर गेल्यावर ऊजवे वळण घ्यायचे होते. फुजी(श्विन), देवधर, मोहित आणि अय्यर ह्यांनी आघाडी घेतली. बाकी सायकलस्वार थोडे मागे राहिले होते. एवढ्यात ऊजवीकडे जाणारा एक अरूंद रस्ता दिसला. फुजी(श्विन) हेच वळण घ्यायचे आहे का, याची गुगलकाकांंकडे चौकशी करत असताना अय्यर, मोहित आणि देवधर पुढे जाऊ लागले. श्विनने त्यांना थांबायला सांगितले. अय्यर आणि मोहित एव्हाना थोडे पुढे गेले असल्याने त्यांंना ते ऐकू आले नाही. सरळ जाणारा रस्ता नागौरकडे जाणारा महामार्ग असल्याने प्रशस्त होता, तर उजवीकडे वळणारा रस्ता अरुंद होता. देवधर श्विनच्या हाकेकडे दुर्लक्ष करत सरळ निघुन गेले. गुगलकाका मात्र ऊजवे वळण घ्यायला सांगत होते. अखेरीस मागे राहीलेल्या सायकलपटूंची वाट पहात फुजी(श्विन)ने तेथेच थांबायचा निर्णय घेतला.
महामार्गाच्या हव्यासापोटी नागौरमार्गे तब्बल ५०-६० किमी अंतर वाढणार होते. मागील सायकलपटू लगेचच आले. त्यांच्याबरोबर गौतमचा टेम्पोही होता. लगेचच गौतमला चुकीच्या दिशेने दौडत निघालेल्या तिघांना परत आणण्यासाठी पाठवले. सगळे परत आल्यावर आम्ही महामार्ग सोडून उजवे वळण घेतले. एव्हाना सगळ्या गोंधळात अर्धा तास तरी निघून गेला होता. मग मात्र आम्ही ते ऊजवे वळण घेत कुचेरा (कुचखेडा)मार्गे कसनाऊ-देहरी-तरनू कडे वळलो. छोट्या गावातून जाणारा रस्ता अरुंद असणे स्वाभाविक असले तरी आता आम्हाला त्याची सवय झाली होती. खरतरं रस्ता खेड्यातील गल्लीएवढा अरूंद झाला होता. मध्यान्हं झाली होती. आम्ही एका छोट्या गावात शिरलो. तिथे चहाची चौकशी करताना मोठ्या मुश्किलीने एक चहा केंद्र सापडले. फुजी(श्विन), ट्रेक, नयना आघारकर चहा घेत असताना आसाभाईंनी रस्त्यात बैठक मारून मेळावा भरवला होता. तेथील कोपऱ्यावर एक कळकट, अंधारे दुकान होते. कसं कोण जाणे सायकलस्वारांना ते मिठाईचे दुकान असल्याचा शोध लागला. दुकानदाराने अस्सल खव्यापासून बनवलेला एक पदार्थ खायला दिला. ओहोहो, गरम गरम बनवलेला तो पदार्थ खाताच सगळ्यांच्याच जीभेला पाणी सुटले. हा, हा म्हणता दुकानातील माल संपला. गाव छोटे असल्याने त्या गावाच्या मानाने खरेदीसाठी कदाचित तो पुरेसा असला तरी त्याचा चट्टामट्टा झाला होता. तेथील लोक त्याला रबडी म्हणत होते. (मात्र आपल्याकडे मिळणारी रबडी ही नव्हे). आम्ही फर्माईश करताच दुकानदाराने पुन्हा एकदा खव्याची ती गरमागरम पाककृती आम्हाला सादर केली.
तेथून निघालो तेव्हा गावकरी आमच्याभोवती कोंडाळे करून ऊभे राहिले होते. त्यांना आम्ही कोणीतरी परग्रहवासीच वाटत होतो. त्या कोंडाळ्यातुन सुटका करत आम्ही पुढील मार्गाला लागलो. वाटेत वन्य पशु पक्षी दर्शन देत होते.
तरनू गाव पार करुन आम्ही नागौर- डीडवाना हमरस्त्याला लागलो. Butterflies in stomach म्हणा की पेटमे चूहे म्हणा की पोटातले कावळे म्हणा ... सगळेच दंगा करु लागले होते. त्यामुळे हमरस्त्याला लागताच एक धाबा पाहून तिथे जठराग्नीला आहुती दिली. ती फुलपाखरे, उंदीर आणि कावळे शांत झाल्यावर आम्ही पुन्हा कुच केले. एव्हाना २.३० वाजले होते आणि आजचे ५५ किमी अंतर बाकी होते. मात्र आता पुढील संपूर्ण मार्ग हा प्रशस्त हमरस्त्याचा होता.
हा हमरस्ता असला तरी गावे एकमेकांपासून दूरदूर आणि छोटी, कमी लोकवस्तीची होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वन्य प्राणी- पक्षी दिसत होते. मोकळ्या हमरस्त्यावरून वेगाने रस्ता ओलांडणाऱ्या निलगायी पाहताना रोमांच ऊभे राहात होते. मोर तर अगदी मुबलक प्रमाणात दिसत होते. एका गोष्टीचे मात्र वाईट वाटत होते की मोर वगळता इतर कोणालाही छायाचित्रबध्द मात्र करता येत नव्हते.
वाटेत पुन्हा दोन वेळा चहा पान करत आम्ही डीडवानाकडे दौडत असताना एका गावाच्या नावाची पाटी पाहून आमचे चांगलेच मनोरंजन झाले.
डीडवाना येथे गंतव्यस्थानी पोहोचेपर्यंत भास्कराचार्य आजचा कारभार आवरता घेऊ लागले होते. अस्मादिकांना आज फुजी साथ करत असली तरी शैलेशभाईंंनी आज टेम्पोमध्ये कमी वेळ घालवून श्विनवरच बऱ्यापैकी वेळ घालवला होता. त्यामुळे फुजी आणि श्विन दोघेही एकसमयावच्छेदे दौड करत असल्याचा दुर्मिळ योग आज आला होता.
डावीकडे मोहित, ऊजविकडे रसिकभाई आणि मधोमध श्विनसह शैलेशभाई
रात्री हॉटेलमधील जेवण यथातथाच होते. मात्र दिवसभरात घडलेल्या राजस्थानमधील ग्रामीण आणि वन्यसफारीने मात्र मन तृप्त झाले होते. आजची सायकलसफर म्हणजे एखाद्या नंदनवनातीलच सफर वाटत होती.

















आपली वर्णन करण्याची पध्दत खुपच छान आहे,असे वाटते वाचकसुध्दा जात आहेआपल्याबरोबर
उत्तर द्याहटवाधन्यवाद, तुमच्या प्रतिक्रियांमुळेच हुरूप वाढतो आणि लिखाण करावेसे वाटते
उत्तर द्याहटवाअसेच छान लिहीत रहा. lockdown मध्येही आपण सायकलींग करत असल्याचा आनंद आम्हाला तुमच्या लेखनाने मिळत आहे.धन्यवाद!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा