'वा, चहा मस्तच आहे. अजून एक बिनासाखरेचा चहा द्या', श्विनने फर्माईश केली. पहाटे ५.३० चा सुमार असावा. अजून फटफटलेले नव्हते. शांत झोप झाल्यावर श्विनला चहा हवाच होता. ओझरच्या भक्तनिवास ४ मधून बाहेर पडून उजव्या हाताला वळून शंभरेक पावलावर उघडे असलेल्या चहाकेंद्रावर श्विन एकटाच गेला होता.
समोरच्या बाकावर एक ग्रामस्थ बसलेले होते. ते चहाकेंद्र त्यांचे नित्याचेच ठिकाण असावे. सहजपणे विषय काढत त्यांनी गप्पांना सुरुवात केली. शोलेतील बसंतीचेच हे खरे वंशज असावेत. सुदैवाने श्विनला मध्येच तोंड उघडायला त्यांनी संधी दिली. त्या संधीचा लाभ घेत श्विनने पोबारा केला. भक्तनिवासात स्कॉटची आवराआवर झालीच होती. दोघेही भक्तनिवासाच्या प्रांगणात आल्यावर पाठोपाठ अटलास आणि हिरो हॉक सुद्धा हजर झाले. सगळ्यांच्या रबरी नळीतील हवेचा दाब तपासल्यावर भक्तनिवासाचा निरोप घेण्यासाठी चौघेही सज्ज झाले. इतक्यात आजूबाजूच्या भक्तगणांनी त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी घेरले. त्यांच्यासह छायाचित्र काढून झाल्यावर श्विन- स्कॉट -अटलास -हिरो हॉक या चौकडीलाही त्यांनी छायाचित्रबद्ध केले.
छायाचित्राचे सत्र झाल्यावर चौघेही भक्तनिवासातून एका लयीत बाहेर पडले. अद्याप रविराज पूर्ण जागे न झाल्याने प्रकाश धुसरच होता. ओझरच्या बाहेर पडल्यावर तर पुढील वाट पूर्णपणे धुक्यात हरवली होती. अटलास आणि हिरो हॉक पुढे होते. मात्र तेही धुक्यात दिसेनासे झाले. श्विन स्कॉटचा वेग मंदावला होता. मात्र सातत्य टिकून होते. डोळे फाडून फाडून बघत असताना श्विनला एक आठवण आली. एकदा श्विन आणि नयना आघरकर यांनी डोंबिवली नेरळ जायचे ठरवले होते. सकाळी ६.३०-७ वाजता दोघे निघाले होते. धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे अतिशय संथगतीने दोघे जात होते. अखेरीस नयना आघारकरांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. दोघेही परत फिरले पण श्विनचे समाधान झाले नव्हते. म्हणून श्विनने किमान अंबरनाथपर्यंत जायचे ठरवले. पुन्हा एकदा नेवाळी फाटा पार केला, तेव्हा ९ वाजले होते. अजूनही डोळ्यासमोर काहिही दिसत नव्हते. श्विनने डोळ्यावरील चष्मा सरकावत चष्मा काढून समोर पाहिले, तर सगळे काही स्वच्छ दिसत होते. चष्म्यावर मात्र धुक्यात दवबिंदू जमा झाले होते. त्या चष्म्यामुळेच अजूनही समोरचे दिसत नव्हते.
त्या आठवणींनी श्विनने एकदा चष्मा सरकावून पाहिला, मात्र आजमात्र अजूनही धुके पसरलेले होतेच. त्यामुळे श्विनसाठी संथ गती शिवाय पर्याय नव्हता. ओझर ते लेण्याद्री पल्ला फारतर १२ किमी. मात्र आता घड्याळ बाबा वेगात धावत होते. साधारण अर्ध्या तासाने सगळे लख्ख दिसू लागले तेव्हा रवीमहाराज बऱ्याच उंचावर पोचले होते.
अटलास आणि हिरो हॉकसुद्धा जवळच होते. अटलासच्या रबरी नळीतील हवेचा दाब थोडा कमी होता. त्यामुळे पुरेशी हवा भरून झाल्यावर अटलास, हिरो हॉक आणि श्विन निघाले. तोपर्यंत स्कॉट पुढे गेली होती. आता अटलास, हिरो हॉक आणि श्विन यांनीही वेग वाढवला. लेण्याद्रीकडे उजवे वळण आले तोपर्यंत स्कॉटला तिघांनीही गाठले.
सगळ्यांनी ते वळण घेत लेण्याद्रीच्या दिशेने दौड सुरू केली. थोड्याच अवधीत चढ सुरू झाला. आता मात्र एकामागोमाग एकजण पुन्हा धीम्या गतीने जाऊ लागले. डाव्या हाताला असलेले भक्तनिवास पाहिल्यावर श्विनने तिकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ अटलास, हिरो हॉक आणि स्कॉटही तेथे गेले. चौघांनाही भक्तनिवासात दावणीला बांधून त्या चौघांचे स्वार आता पायउतार होऊन लेण्याद्रीच्या डोंगराच्या पायऱ्यांकडे वळले.
लेण्याद्रीच्या डोंगरावर चढत असताना वाटेत बऱ्याचदा माकडे हातातील वस्तू खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याकडील सर्व सामान भक्तनिवासाच्या आवारात दावणीला बांधलेल्या श्विन, अटलास आणि हिरो हॉक यांच्याकडे सोपवूनच सर्व स्वार लेण्याद्रीच्या तिकीट खिडकीपाशी पोचले. तरीही काही सामान शर्टच्या मागील खिश्यात ठेवलेले होते, ते सामान त्या तिकीट खिडकीत जमा केले. आम्ही सर्वजण सकाळी ८ च्या आत चढण सुरू केल्यामुळे लेण्याद्रीदर्शनाचे तिकीट काढावे लागले नाही.
पायऱ्या चढत असताना अस्मादिकांनी घातलेल्या डोंबिवली सायकल क्लबचा शर्ट, सायकलचे हातमोजे आणि डोक्यावरील संरक्षक कवच यामुळे इतर भाविकांना उत्सुकता निर्माण होत होती. अर्थात इतर तिघांकडेही अशीच काही आयुधे होतीच. सायकलिंग करून गड किल्ले चढले की पाय जरा मोकळे होतात हा अनुभव अस्मादिकांनी डोंबिवली ते कर्नाळा सायकलिंग करून कर्नाळा सर केला तेव्हा आला होताच. आत्ताही अस्मादिक तोच आनंद अनुभवत होते.
एकाच दमात लेण्याद्रीचा डोंगर सर केल्यावर सगळे सायकलस्वार गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी गुंफेत शिरले.
अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे जो गिरी म्हणजे डोंगरावर स्थित आहे.
मुळातील बौद्ध विहार असलेल्या गुंफामालिकेतील सातवी गुंफा आता गणेशमंदिर म्हणून मान्यताप्राप्त पावली आहे. येथे एकंदर २६ गुंफा असून त्यांना पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने क्रमांक दिले आहेत. ह्या गुंफा दक्षिणाभिमुख आहेत. ६ आणि १४ क्रमांकाची गुंफा चैत्यगृह अथवा देवळाच्या स्वरूपात असून इतर गुंफा ह्या विहार अर्थात मठवासी साधू/ भिक्षु यांच्या वास्तव्यासाठी आहेत. सर्व गुंफा पहिले ते तिसऱ्या शतकातील असून गणेशमंदिरही पहिल्या शतकातील आहे. ह्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी २८३ पायऱ्या चढाव्या लागतात ज्या गणपतीने इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक समजले जातात. गणेशमंदिर म्हणून मान्यता पावलेली ही गुंफा अश्या पद्धतीने बांधली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य उगवत राहील तोपर्यंत प्रकाश आत येत राहील. मंदिर दक्षिणाभिमुख असून गणपती मात्र उत्तराभिमुख आहे, ज्यामुळे गणपतीचे मुख पर्वताच्या विरुद्ध दिशेला आहे असे मानले जाते. पेशव्यांनी गणेशाचे मुख शोधण्याचा असफल प्रयत्नही करून पाहिला होता.
गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यावर सगळे सायकलपटू शांतपणे सभामंडपामध्ये बसले. तेथील शांत वातावरणात गणेशाची प्रार्थना करत सगळेजण उल्हसित झाले होते. सायकल पटू सभामंडपाबाहेर पडताच इतर भाविकांनी त्यांना घेरले. त्या भाविकांना सायकलपटूंसह छायाचित्र काढून घ्यायचे होते. सगळ्या सायकलपटूंनी सर्व इच्छुक भविकांबरोबर छायाचित्र काढू दिले.
लेण्याद्रीच्या डोंगरावरून आसपासचा परिसरच नव्हे तर आकाशही विलोभनीय दिसत होते.
ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून सगळे सायकलपटू लेण्याद्रीचा डोंगर उतरू लागले.
सर्व पायऱ्या उतरून सायकलपटू पायथ्याशी असलेल्या क्षुधाशांतिगृहकडे मोर्चा वळवला. येथील जेवण श्विनला नेहमीच आवडे, त्यामुळे अष्टविनायकयात्रा करत असताना किमान एक रात्र लेण्याद्री येथे मुक्काम करण्यास श्विन नेहमीच उत्सुक असे. यावेळी रात्री मुक्काम न करता आल्याने जेवणाची तहान केवळ सकाळच्या नाश्त्यावर भागवावी लागणार होती. थोड्याच वेळात हातातोंडाची लढाई सुरू झाली. मनसोक्त नाष्टा झाल्यावर आजूबाजूच्या दुकानात फेरफटका मारून भक्तनिवासाशेजारील श्विन स्कॉटला आम्ही बंधमुक्त केले.
श्विन आणि स्कॉट थोडे आधी निघाले. मात्र अटलास आणि हिरो हॉक गिरिजात्मजाच्या पायथ्याशी आणखी काही काळ थांबले. माळशेज घाट उतरेपर्यंत तरी श्विन, स्कॉट थोडे पुढे राहतील आणि अटलास, हिरो हॉक मागे राहतील असे चौघांनी ठरवले होते. त्या दृष्टीने श्विन स्कॉट पुढे निघाले होते. लेण्याद्री डोंगरातील उताराचा रस्ता श्विन स्कॉट उजवीकडे वळले. रस्ता कमी वर्दळीचा आणि रुंद तसेच सुंदर होता. दोघांनी वेग घेतला आणि काही काळातच गणेशखिंडीचा चढ सुरू झाला. सुरुवातीला रस्ता चांगल्या अवस्थेत होता आणि चढ कमी तीव्रतेचा होता. मात्र एका चढणीपाठोपाठ दुसरी त्यानंतर तिसरी अश्या अनेक चढणी लागत असल्याने श्विन स्कॉटचा वेग बऱ्यापैकी मंदावला. पुढे पुढे रस्ताही खराब अवस्थेत होता.
काही ठिकाणी तर कोणतीही दुचाकी घसरू शकेल इतका रस्ता खराब झाला होता. श्विन आणि स्कॉटने नेटाने गणेशखिंड सर केली. गणेशखिंड सर करून तेथील गणेशाचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटची वाट पाहत होता. सभोवार पाहता सुंदर वातावरण होते. स्कॉटही थोड्या वेळात तेथे पोचली. खिंड पार केल्याबद्दल स्कॉटला आनंद झाला होता. गणेशमंदिराजवळ येऊन दोघांनी मंदिरातही श्री गणेशाचे दर्शन घेतले. तेथील वारा अंगावर घेऊन दोघेही प्रसन्न झाले होते. श्विन स्कॉटने चिक्की खाऊन आपला आनंद साजरा केला. एवढ्यात दुचाकीवरून दोनजण मंदिरापाशी येऊन दर्शन घेऊ लागले. श्विन स्कॉटने त्यांनाही चिक्की देऊन आनंदात सहभागी करून घेतले.
हा आनंदोत्सव साजरा करत दोघेही गणेशखिंडीवरून सभोवार पाहू लागले.
गणेशखिंड सर केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अंगावर येणाऱ्या वाऱ्यासह दोघेही ते समाधान आणि आनंद व्यक्त करत तेथे रेंगाळले तेव्हा दिवसभरातील उरलेल्या ११० किमी अंतराच्या ताणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.
समोरच्या बाकावर एक ग्रामस्थ बसलेले होते. ते चहाकेंद्र त्यांचे नित्याचेच ठिकाण असावे. सहजपणे विषय काढत त्यांनी गप्पांना सुरुवात केली. शोलेतील बसंतीचेच हे खरे वंशज असावेत. सुदैवाने श्विनला मध्येच तोंड उघडायला त्यांनी संधी दिली. त्या संधीचा लाभ घेत श्विनने पोबारा केला. भक्तनिवासात स्कॉटची आवराआवर झालीच होती. दोघेही भक्तनिवासाच्या प्रांगणात आल्यावर पाठोपाठ अटलास आणि हिरो हॉक सुद्धा हजर झाले. सगळ्यांच्या रबरी नळीतील हवेचा दाब तपासल्यावर भक्तनिवासाचा निरोप घेण्यासाठी चौघेही सज्ज झाले. इतक्यात आजूबाजूच्या भक्तगणांनी त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी घेरले. त्यांच्यासह छायाचित्र काढून झाल्यावर श्विन- स्कॉट -अटलास -हिरो हॉक या चौकडीलाही त्यांनी छायाचित्रबद्ध केले.
छायाचित्राचे सत्र झाल्यावर चौघेही भक्तनिवासातून एका लयीत बाहेर पडले. अद्याप रविराज पूर्ण जागे न झाल्याने प्रकाश धुसरच होता. ओझरच्या बाहेर पडल्यावर तर पुढील वाट पूर्णपणे धुक्यात हरवली होती. अटलास आणि हिरो हॉक पुढे होते. मात्र तेही धुक्यात दिसेनासे झाले. श्विन स्कॉटचा वेग मंदावला होता. मात्र सातत्य टिकून होते. डोळे फाडून फाडून बघत असताना श्विनला एक आठवण आली. एकदा श्विन आणि नयना आघरकर यांनी डोंबिवली नेरळ जायचे ठरवले होते. सकाळी ६.३०-७ वाजता दोघे निघाले होते. धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे अतिशय संथगतीने दोघे जात होते. अखेरीस नयना आघारकरांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. दोघेही परत फिरले पण श्विनचे समाधान झाले नव्हते. म्हणून श्विनने किमान अंबरनाथपर्यंत जायचे ठरवले. पुन्हा एकदा नेवाळी फाटा पार केला, तेव्हा ९ वाजले होते. अजूनही डोळ्यासमोर काहिही दिसत नव्हते. श्विनने डोळ्यावरील चष्मा सरकावत चष्मा काढून समोर पाहिले, तर सगळे काही स्वच्छ दिसत होते. चष्म्यावर मात्र धुक्यात दवबिंदू जमा झाले होते. त्या चष्म्यामुळेच अजूनही समोरचे दिसत नव्हते.
त्या आठवणींनी श्विनने एकदा चष्मा सरकावून पाहिला, मात्र आजमात्र अजूनही धुके पसरलेले होतेच. त्यामुळे श्विनसाठी संथ गती शिवाय पर्याय नव्हता. ओझर ते लेण्याद्री पल्ला फारतर १२ किमी. मात्र आता घड्याळ बाबा वेगात धावत होते. साधारण अर्ध्या तासाने सगळे लख्ख दिसू लागले तेव्हा रवीमहाराज बऱ्याच उंचावर पोचले होते.
अटलास आणि हिरो हॉकसुद्धा जवळच होते. अटलासच्या रबरी नळीतील हवेचा दाब थोडा कमी होता. त्यामुळे पुरेशी हवा भरून झाल्यावर अटलास, हिरो हॉक आणि श्विन निघाले. तोपर्यंत स्कॉट पुढे गेली होती. आता अटलास, हिरो हॉक आणि श्विन यांनीही वेग वाढवला. लेण्याद्रीकडे उजवे वळण आले तोपर्यंत स्कॉटला तिघांनीही गाठले.
सगळ्यांनी ते वळण घेत लेण्याद्रीच्या दिशेने दौड सुरू केली. थोड्याच अवधीत चढ सुरू झाला. आता मात्र एकामागोमाग एकजण पुन्हा धीम्या गतीने जाऊ लागले. डाव्या हाताला असलेले भक्तनिवास पाहिल्यावर श्विनने तिकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ अटलास, हिरो हॉक आणि स्कॉटही तेथे गेले. चौघांनाही भक्तनिवासात दावणीला बांधून त्या चौघांचे स्वार आता पायउतार होऊन लेण्याद्रीच्या डोंगराच्या पायऱ्यांकडे वळले.
लेण्याद्रीच्या डोंगरावर चढत असताना वाटेत बऱ्याचदा माकडे हातातील वस्तू खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याकडील सर्व सामान भक्तनिवासाच्या आवारात दावणीला बांधलेल्या श्विन, अटलास आणि हिरो हॉक यांच्याकडे सोपवूनच सर्व स्वार लेण्याद्रीच्या तिकीट खिडकीपाशी पोचले. तरीही काही सामान शर्टच्या मागील खिश्यात ठेवलेले होते, ते सामान त्या तिकीट खिडकीत जमा केले. आम्ही सर्वजण सकाळी ८ च्या आत चढण सुरू केल्यामुळे लेण्याद्रीदर्शनाचे तिकीट काढावे लागले नाही.
पायऱ्या चढत असताना अस्मादिकांनी घातलेल्या डोंबिवली सायकल क्लबचा शर्ट, सायकलचे हातमोजे आणि डोक्यावरील संरक्षक कवच यामुळे इतर भाविकांना उत्सुकता निर्माण होत होती. अर्थात इतर तिघांकडेही अशीच काही आयुधे होतीच. सायकलिंग करून गड किल्ले चढले की पाय जरा मोकळे होतात हा अनुभव अस्मादिकांनी डोंबिवली ते कर्नाळा सायकलिंग करून कर्नाळा सर केला तेव्हा आला होताच. आत्ताही अस्मादिक तोच आनंद अनुभवत होते.
एकाच दमात लेण्याद्रीचा डोंगर सर केल्यावर सगळे सायकलस्वार गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी गुंफेत शिरले.
अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे जो गिरी म्हणजे डोंगरावर स्थित आहे.
मुळातील बौद्ध विहार असलेल्या गुंफामालिकेतील सातवी गुंफा आता गणेशमंदिर म्हणून मान्यताप्राप्त पावली आहे. येथे एकंदर २६ गुंफा असून त्यांना पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने क्रमांक दिले आहेत. ह्या गुंफा दक्षिणाभिमुख आहेत. ६ आणि १४ क्रमांकाची गुंफा चैत्यगृह अथवा देवळाच्या स्वरूपात असून इतर गुंफा ह्या विहार अर्थात मठवासी साधू/ भिक्षु यांच्या वास्तव्यासाठी आहेत. सर्व गुंफा पहिले ते तिसऱ्या शतकातील असून गणेशमंदिरही पहिल्या शतकातील आहे. ह्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी २८३ पायऱ्या चढाव्या लागतात ज्या गणपतीने इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक समजले जातात. गणेशमंदिर म्हणून मान्यता पावलेली ही गुंफा अश्या पद्धतीने बांधली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य उगवत राहील तोपर्यंत प्रकाश आत येत राहील. मंदिर दक्षिणाभिमुख असून गणपती मात्र उत्तराभिमुख आहे, ज्यामुळे गणपतीचे मुख पर्वताच्या विरुद्ध दिशेला आहे असे मानले जाते. पेशव्यांनी गणेशाचे मुख शोधण्याचा असफल प्रयत्नही करून पाहिला होता.
गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यावर सगळे सायकलपटू शांतपणे सभामंडपामध्ये बसले. तेथील शांत वातावरणात गणेशाची प्रार्थना करत सगळेजण उल्हसित झाले होते. सायकल पटू सभामंडपाबाहेर पडताच इतर भाविकांनी त्यांना घेरले. त्या भाविकांना सायकलपटूंसह छायाचित्र काढून घ्यायचे होते. सगळ्या सायकलपटूंनी सर्व इच्छुक भविकांबरोबर छायाचित्र काढू दिले.
लेण्याद्रीच्या डोंगरावरून आसपासचा परिसरच नव्हे तर आकाशही विलोभनीय दिसत होते.
ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून सगळे सायकलपटू लेण्याद्रीचा डोंगर उतरू लागले.
सर्व पायऱ्या उतरून सायकलपटू पायथ्याशी असलेल्या क्षुधाशांतिगृहकडे मोर्चा वळवला. येथील जेवण श्विनला नेहमीच आवडे, त्यामुळे अष्टविनायकयात्रा करत असताना किमान एक रात्र लेण्याद्री येथे मुक्काम करण्यास श्विन नेहमीच उत्सुक असे. यावेळी रात्री मुक्काम न करता आल्याने जेवणाची तहान केवळ सकाळच्या नाश्त्यावर भागवावी लागणार होती. थोड्याच वेळात हातातोंडाची लढाई सुरू झाली. मनसोक्त नाष्टा झाल्यावर आजूबाजूच्या दुकानात फेरफटका मारून भक्तनिवासाशेजारील श्विन स्कॉटला आम्ही बंधमुक्त केले.
श्विन आणि स्कॉट थोडे आधी निघाले. मात्र अटलास आणि हिरो हॉक गिरिजात्मजाच्या पायथ्याशी आणखी काही काळ थांबले. माळशेज घाट उतरेपर्यंत तरी श्विन, स्कॉट थोडे पुढे राहतील आणि अटलास, हिरो हॉक मागे राहतील असे चौघांनी ठरवले होते. त्या दृष्टीने श्विन स्कॉट पुढे निघाले होते. लेण्याद्री डोंगरातील उताराचा रस्ता श्विन स्कॉट उजवीकडे वळले. रस्ता कमी वर्दळीचा आणि रुंद तसेच सुंदर होता. दोघांनी वेग घेतला आणि काही काळातच गणेशखिंडीचा चढ सुरू झाला. सुरुवातीला रस्ता चांगल्या अवस्थेत होता आणि चढ कमी तीव्रतेचा होता. मात्र एका चढणीपाठोपाठ दुसरी त्यानंतर तिसरी अश्या अनेक चढणी लागत असल्याने श्विन स्कॉटचा वेग बऱ्यापैकी मंदावला. पुढे पुढे रस्ताही खराब अवस्थेत होता.
काही ठिकाणी तर कोणतीही दुचाकी घसरू शकेल इतका रस्ता खराब झाला होता. श्विन आणि स्कॉटने नेटाने गणेशखिंड सर केली. गणेशखिंड सर करून तेथील गणेशाचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटची वाट पाहत होता. सभोवार पाहता सुंदर वातावरण होते. स्कॉटही थोड्या वेळात तेथे पोचली. खिंड पार केल्याबद्दल स्कॉटला आनंद झाला होता. गणेशमंदिराजवळ येऊन दोघांनी मंदिरातही श्री गणेशाचे दर्शन घेतले. तेथील वारा अंगावर घेऊन दोघेही प्रसन्न झाले होते. श्विन स्कॉटने चिक्की खाऊन आपला आनंद साजरा केला. एवढ्यात दुचाकीवरून दोनजण मंदिरापाशी येऊन दर्शन घेऊ लागले. श्विन स्कॉटने त्यांनाही चिक्की देऊन आनंदात सहभागी करून घेतले.
हा आनंदोत्सव साजरा करत दोघेही गणेशखिंडीवरून सभोवार पाहू लागले.
गणेशखिंड सर केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अंगावर येणाऱ्या वाऱ्यासह दोघेही ते समाधान आणि आनंद व्यक्त करत तेथे रेंगाळले तेव्हा दिवसभरातील उरलेल्या ११० किमी अंतराच्या ताणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा