#Shravanchallange day 18. Indian National date Saur Shravan 18, shake 1939
आज सकाळी श्विनसवारी सुरु झाली तेव्हा आदित्यमहाराज प्रसन्न मुद्रेने स्वागत करत होते. वातावरण उत्साही होते. डोंबिवली, ९० फूट रस्ता, पत्री पूल करून श्विनने दुर्गाडी किल्याजवळील पूल सहजपणे पार केला. सर्वत्र रवीमहाराजांच्या कृपेने सर्व रस्ते कोरडे होते.
नाशिक ठाणे रस्त्यावर पिंपळास पुढील पूल आणि खिंडीनंतर आजही गोवंश मेजवानीची माजा घेत होता. त्यांचे निसर्गाबरोबरील हितगुज मला पुढे जाऊ देईना. एक गोंडस वासरू सुखेनैव चरत असल्याचे पाहून मी त्याला मोबाईलकॅमेरात टिपू लागलो. हे लक्षात येता भाव न खाता त्याने मला कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे पोझ द्यायला सुरुवात केली. त्याचे मनसोक्त फोटोसेशन करून मी निघालो.
लोढा साईमंदिरापाशी असलेल्या चढावरून ठाण्याकडे पहिले तर क्षितिज काळेकुट्ट दिसत होते. हि तर वरूणराजाच्या अस्तित्वाची ठळक निशाणी होती. तरी ठाणे अजून १३ किमी लांब असल्याने मी जाईपर्यंत पाऊस थांबण्याची 'छोटीसी आशा' होती.
पण क्षणार्धात माणकोलीच्या अवकाशातही काळे ढग दिसू लागले आणि दोनचार थेंब अंगावर पडले. मात्र उताराचा फायदा घेत माणकोलिपर्यंत सुसाट जाण्याचा श्विनचा निर्धार होता. तो उतार जेमतेम संपला अन पवनमहाराजांनी रुद्रावतार धारण केला. मग मात्र अस्मादिकांनी ताबडतोब पावसाळी शिरस्त्राण आणि पावसाळी चिलखत धारण केले.
श्रावणाने नेहमीप्रमाणेच पर्जन्यमहाराजांना थोड्याच वेळात आवर घातला. मात्र यावेळेपर्यंत सरकारच्या मेहरबानीमुळे रस्त्यात तयार झालेली तळी पूर्ण भरली. आदित्यनारायणाने पुन्हा दर्शन दिल्यामुळे अंगावरील चिलखत सुकले तरी रस्ते कोरडे होऊ शकत नव्हते. त्यामुळे आभाळ निरभ्र झाले तरी रस्त्यावरील तिथप्रसादाचा नखशिखान्त अभिषेक होऊ नये म्हणून पावसाळी चिलखत घालूनच पुढे प्रवास करावा लागला.
माणकोली येथे रेनकोट का घातला नाही म्हणून वरुणराज संतापले होते, तर अंजुरदिवेपासून रेनकोट का घातला म्हणून आदित्यमहाराजांनी आग ओकायला सुरुवात केली.
या दोघांच्या तावडीत आयताच सापडल्याने आधी पावसाने आणि नंतर घामाने भिजूनच मी ऑफिसला पोचलो....
#saveoursahyadri #tjsbbank #dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens
आज सकाळी श्विनसवारी सुरु झाली तेव्हा आदित्यमहाराज प्रसन्न मुद्रेने स्वागत करत होते. वातावरण उत्साही होते. डोंबिवली, ९० फूट रस्ता, पत्री पूल करून श्विनने दुर्गाडी किल्याजवळील पूल सहजपणे पार केला. सर्वत्र रवीमहाराजांच्या कृपेने सर्व रस्ते कोरडे होते.
नाशिक ठाणे रस्त्यावर पिंपळास पुढील पूल आणि खिंडीनंतर आजही गोवंश मेजवानीची माजा घेत होता. त्यांचे निसर्गाबरोबरील हितगुज मला पुढे जाऊ देईना. एक गोंडस वासरू सुखेनैव चरत असल्याचे पाहून मी त्याला मोबाईलकॅमेरात टिपू लागलो. हे लक्षात येता भाव न खाता त्याने मला कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे पोझ द्यायला सुरुवात केली. त्याचे मनसोक्त फोटोसेशन करून मी निघालो.
लोढा साईमंदिरापाशी असलेल्या चढावरून ठाण्याकडे पहिले तर क्षितिज काळेकुट्ट दिसत होते. हि तर वरूणराजाच्या अस्तित्वाची ठळक निशाणी होती. तरी ठाणे अजून १३ किमी लांब असल्याने मी जाईपर्यंत पाऊस थांबण्याची 'छोटीसी आशा' होती.
पण क्षणार्धात माणकोलीच्या अवकाशातही काळे ढग दिसू लागले आणि दोनचार थेंब अंगावर पडले. मात्र उताराचा फायदा घेत माणकोलिपर्यंत सुसाट जाण्याचा श्विनचा निर्धार होता. तो उतार जेमतेम संपला अन पवनमहाराजांनी रुद्रावतार धारण केला. मग मात्र अस्मादिकांनी ताबडतोब पावसाळी शिरस्त्राण आणि पावसाळी चिलखत धारण केले.
श्रावणाने नेहमीप्रमाणेच पर्जन्यमहाराजांना थोड्याच वेळात आवर घातला. मात्र यावेळेपर्यंत सरकारच्या मेहरबानीमुळे रस्त्यात तयार झालेली तळी पूर्ण भरली. आदित्यनारायणाने पुन्हा दर्शन दिल्यामुळे अंगावरील चिलखत सुकले तरी रस्ते कोरडे होऊ शकत नव्हते. त्यामुळे आभाळ निरभ्र झाले तरी रस्त्यावरील तिथप्रसादाचा नखशिखान्त अभिषेक होऊ नये म्हणून पावसाळी चिलखत घालूनच पुढे प्रवास करावा लागला.
माणकोली येथे रेनकोट का घातला नाही म्हणून वरुणराज संतापले होते, तर अंजुरदिवेपासून रेनकोट का घातला म्हणून आदित्यमहाराजांनी आग ओकायला सुरुवात केली.
या दोघांच्या तावडीत आयताच सापडल्याने आधी पावसाने आणि नंतर घामाने भिजूनच मी ऑफिसला पोचलो....
#saveoursahyadri #tjsbbank #dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा